गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (10:20 IST)

Mahatma Gandhi Quotes महात्मा गांधींचे 30 अनमोल वचन

gandhi quotes
1. माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हा माझा देव आहे, अहिंसा हे ते मिळवण्याचे साधन आहे.
 
2. प्रार्थना मागणे नव्हे तर ही आत्म्याची तळमळ आहे. ही दररोज आपल्या दुर्बलतेची पावती आहे. शब्दांशिवाय प्रार्थना करणे, शब्द असूनही मन न लागण्यापेक्षा उत्तम आहे.
 
3. शुद्ध अंतकरणाला जे जाणवतं तेच सत्य आहे.
 
4. सकाळी सर्वप्रथम संकल्प करूया की मी जगात कोणालाही घाबरणार नाही. नाही, मला फक्त देवाची भीती वाटते. कोणाबद्दलही वाईट भावना नसाव्या. मी कोणाच्याही अन्यायापुढे झुकणार नाही. मी असत्याला सत्याने जिंकून, असत्याचा प्रतिकार करताना सर्व दुःख सहन करू शकेन.
 
5. चूक करणे तर पाप आहेच, पण ती लपवणे त्याहून मोठे पाप आहे.
 
6. भविष्यात काय होईल, याचा विचार करायचा नाही. मला वर्तमानाची काळजी वाटते. देवाने मला येणाऱ्या क्षणांवर नियंत्रण दिलेले नाही.
 
7. मला हिंदीच्या माध्यमातून प्रांतीय भाषा दडपून टाकायच्या नाहीत, तर हिंदीचे विलीनीकरण करायचे आहे.
 
8. आपली चूक मान्य करणे म्हणजे झाडून टाकण्यासारखे आहे, ज्यामुळे जमीन चमकदार आणि स्वच्छ राहते.
 
9. फक्त आनंद एकमेव अत्तर आहे जे तुम्ही इतरांवर शिंपडता, तर त्याचे काही थेंब तुमच्यावरही पडतात.
 
10. जे वेळेची बचत करतात ते पैसे वाचवतात आणि वाचवलेले पैसे कमावलेल्या पैशाच्या बरोबरीचे असतात.
 
11. माणूस हा त्याच्या विचारांनी निमिर्त एक प्राणी आहे, तो जे विचार करतो ते बनतो.
 
12. कामाचा अतिरेक नाही, अनियमितता माणसाला मारते.
 
13. गुलाबाला उपदेश करण्याची गरज नाही. तो फक्त त्याचा आनंद पसरवतो. त्याचा सुगंध हाच त्याचा संदेश आहे.
 
14. आपण ज्याची उपासना करतो त्याच्यासारखे बनतो.
 
15. श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास आणि आत्मविश्वास म्हणजे ईश्वरावरील विश्वास.
 
16. काही लोक यशाची फक्त स्वप्ने पाहतात तर काही लोक जागे होऊन कठोर परिश्रम करतात.
 
17. सुख ही बाहेरून मिळण्याची गोष्ट नाही, पण अहंकार सोडल्याशिवाय ते प्राप्त होणार नाही. स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करा.
 
18. आपली मान्यता आपले विचार बनतात, आपले विचार आपले शब्द बनतात, आपले शब्द आपली कृती बनतात, आपली कृती आपल्या सवयी बनतात, आपल्या सवयी आपले मूल्य बनतात, आपली मूल्ये आपलं भाग्य बनतात.
 
19. अहिंसा हेच धर्म आहे, जीवनपद्धती आहे.
 
20. ज्या दिवशी प्रेमाची शक्ती, शक्तीच्या प्रेमावर मात करेल त्या दिवशी जगात शांतता नांदेल.
 
21. एखादी गोष्ट करताना, एकतर ती प्रेमाने करा किंवा ती कधीही करू नका.
 
22. जगात असे लोक आहेत जे इतके भुकेले आहेत की ते देवाला भाकरीच्या रूपाशिवाय इतर कोणत्याही रूपात दिसत नाही.
 
23. चिंतेपेक्षा काहीही शरीराचा नाश करत नाही आणि ज्याची देवावर थोडीदेखील श्रद्धा आहे त्याला कशाचीही चिंता करण्याची लाज वाटली पाहिजे.
 
24. प्रेम ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे आणि तरीही आपण कल्पना करू शकत असलेल्या सर्वांपेक्षा नम्र आहे.
 
25. स्वतःला जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला मग्न करणे.
 
26. जोपर्यंत तुम्ही त्यांना गमावत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी कोण महत्वाचे आहे हे तुम्हाला समजत नाही.
 
27. प्रेमाची शक्ती दंड शक्तीपेक्षा हजारपटीने अधिक प्रभावी आणि शाश्वत असते.
 
28. चुका करण्याचे स्वातंत्र्य असल्याशिवाय स्वातंत्र्याला काही अर्थ नाही.
 
29. पापाचा द्वेष करा, पापीवर प्रेम करा.
 
30. ज्याला वाटेल तो आपल्या अंतरात्म्याची ध्वनी ऐकू शकतो. ती प्रत्येकाच्या आत आहे.

Edited by: Rupali Barve