1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (23:43 IST)

मुंबईत चालत्या कार ने पेट घेतला , मोठी जीवित हानी टळली

up, accident
नशीब बलवत्तर असेल तर कोणी काहीच करू शकत नाही. वाईट वेळ जरी आली असेल तर ती ही टळून जाते. असे काहीसे घडले आहे. मुंबईत. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला जेपी रोड वर मुंबईच्या सात बंगला भागातून वर्सोवा कोळीवाड्याच्या दिशेने चाललेल्या होंडासिटी कारने दर्या महल बंगल्यासमोर  अचानक पेट घेतला. सादर घटना शनिवारी रात्री 8:15 च्या सुमारास घडली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. प्रसांगावधान राखून कारमध्ये बसलेले तिन्ही प्रवाशी कार मधून खाली उतरले आणि बचावले. 
 
Edited By - Priya Dixit