संबंधित माहिती
- पावसात सोयाबीन-पिकात पिवळेपणा? शेतकऱ्यांनी तात्काळ करा 'हे' उपाय
- सततच्या पावसामुळे पिकांवर रोगांचा धोका; कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा
- शेतकऱ्यांना दुहेरी भेट: कर्जमाफीनंतर ४८,००० कोटी रुपयांची वीज बिलेही माफ
- शेतकरी कर्जमाफी जाहीर; फडणवीसांची मोठी घोषणा
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कर्जमाफी योजनेत सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला
कापूस पिकावर रोग दिसताच करा हे काम
कापूस हे आपल्याकडील एक मुख्य नगदी पीक आहे. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत किंवा दमट हवामानात कापसावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो. कापूस पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी शेतात रोग दिसताच शेतकऱ्यांनी तात्काळ खालील उपाययोजना कराव्यात.
मुख्य रोग आणि त्यांची प्राथमिक लक्षणे
पानावरील ठिपके : पानांवर लसणाची किंवा तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके पडतात.
दहिया रोग : पानाच्या खालच्या बाजूला पांढरट-राखाडी रंगाची बुरशी (दह्यासारखी) दिसते.
दहिया रोग : पानाच्या खालच्या बाजूला पांढरट-राखाडी रंगाची बुरशी (दह्यासारखी) दिसते.
लाल लाल्या रोग : अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे जुनी पाने लाल होतात आणि कडा सुकतात.
मूळ कूज / मर रोग : झाड अचानक सुकते आणि उपटल्यास मुळे सडलेली दिसतात.
रोग दिसताच करायचे तात्काळ उपाय.
बाधित झाडे/पाने वेगळी करा: संसर्ग रोखणे.शेतात एखाद्या रोगाची सुरुवात झाल्यास, रोगट पाने किंवा झाडे उपटून शेताबाहेर नेऊन नष्ट करा किंवा जमिनीत गाडून टाका. यामुळे हवेद्वारे किंवा स्पर्शाने पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार थांबतो.
तात्काळ बुरशीनाशकाची फवारणी
बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण : ठिपके किंवा दहिया रोगाची लक्षणे दिसताच खालीलपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करा
कॉपर ऑक्सीक्लोराईड : २५ ग्रॅम + स्ट्रिप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब (उदा. साफ पावडर): २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी.
अन्नद्रव्यांची पूर्तता
लाल्या रोगाचे नियंत्रण : जर कापसाची पाने लाल पडत असतील, तर ती अन्नद्रव्यांची कमतरता असते.
उपाय: याच्या नियंत्रणासाठी मॅग्नेशियम सल्फेट (MgSO4) ५० ग्रॅम आणि १९:१९:१९ विद्राव्य खत ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतातील पाणी बाहेर काढा
अतिरिक्त पाण्याचा निचरा : मर रोग किंवा मूळ कूज लागण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतात पाणी साचणे. त्यामुळे कापसाच्या तासांमधून चर काढून साचलेले पाणी शेताबाहेर काढून द्या, जेणेकरून मुळांना हवा मिळेल.
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
पावसाळी वातावरणात औषध फवारताना त्यात चांगल्या दर्जाचे सिलिकॉन आधारित स्टिकर (चिकटवणारे औषध) अवश्य वापरा. रोगासोबतच रसशोषक किडींचा (मावा, तुडतुडे, पांढरी माशी) प्रादुर्भाव असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशक बुरशीनाशकासोबत मिक्स करा.
Edited By- Dhanashri Naik
