शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. गुरूमंत्र
Written By
Last Updated : शनिवार, 6 मार्च 2021 (18:37 IST)

यश नक्कीच तुमचेच आहे, या काही टिप्स अवलंबवा

आपल्या आयुष्याची प्रत्येक वेळ महत्त्वाची आहे.त्या वेळेत आपण जे काही कराल त्याचा परिणाम भविष्यावर पडतो. प्रत्येकाच यश मिळावं हेच स्वप्न असत.यश मिळविण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने प्रयत्न करत असतो. तरी ही यश मिळत नाही. यश मिळविण्यासाठी काही सोप्या टिप्स अवलंबवा. म्हणजे यश नक्कीच आपलेच आहे.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 योग्य ध्येयाची निवड करा- 
प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही ध्येय आहे.कोणाला अधिक श्रीमंत व्हायचे आहे तर कोणाला डॉक्टर बनायचे आहे. आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते मिळाले म्हणजे आपले ध्येय पूर्ण झाले असा समज आहे. केवळ ध्येय मिळावं हा विचार करून काही ध्येय मिळणार नाही त्यासाठी आपल्याला काय करावयाचे आहे आपल्या ध्येयाची प्राप्ती कशी होईल आणि त्या साठी काय करावे लागणार ह्याचा विचार करून योग्य ध्येयाची निवड करा. आणि मनापासून ध्येय प्राप्ती साठी प्रयत्न करा. मग यश नक्कीच आपले आहे.    
 
2 आपले लक्ष्य ध्येयावर केंद्रित करा-
यश मिळविण्यासाठीचा ही  महत्त्वाची टिप्स आहे. आपण आपले ध्येय निश्चित केले आहे. कधीकधी ध्येय प्राप्तीसाठीची इच्छा कमी होत जाते ह्याचे कारण मार्गात अडथळे येणं.कोणतेही ध्येय गाठण्यासाठी  किंवा यश मिळविण्यासाठी आयुष्यात चढ -उतार येतातच. अपयशाला घाबरून न जाता ध्येय प्राप्ती साठी प्रयत्नशील राहा.या साठी ध्येय विभागून घ्या. म्हणजे करायला सोपे होईल नंतर योग्य दिशेने, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पाऊल वाढवा. यश नक्की मिळेल.
 
3 कठोर परिश्रम करण्यास तयार राहा-
आपल्याला माहीत आहे की आपले ध्येय काय आहे. आता त्या ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यासाठी सज्ज राहा.यश मिळविणे काही भेटस्वरूपी नाही की आपोआप मिळेल.यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागते. असं म्हणतात की यश नेहमी वेळ आणि मेहनत मागतो.योग्य वेळी ,योग्य दिशेने, योग्य रणनीती बनवून केलेले प्रयत्न यशाचे मार्ग उघडतात. बऱ्याच वेळा आपल्याला अधिक परिश्रम करावे लागते. नंतर यशाची प्राप्ती होते. या जगात जेवढे प्रसिद्ध व्यक्ती आहे त्यांनी देखील आपल्या कठोर परिश्रमाच्या बळानेच यश मिळविले आहे. जेव्हा आपण आपल्या कठोर परिश्रमाने ध्येय प्राप्तीसाठी काम करता त्याचे यश आपल्याला नक्की मिळतेच. 
 
यशाच्या प्राप्तीसाठी काम करताना हे लक्षात ठेवा-
* कठोर परिश्रम म्हणजे आपण यश मिळविण्यासाठी दिलेली किंमत.
* कठोर परिश्रम हे शिस्तबद्धता आणते.
* कठोर परिश्रम केल्याने आपण स्वतःचे नशीब घडवतो.
* कठोर परिश्रम आपल्याला चांगले परिणाम देते.
 
4 यशःप्राप्तीसाठी वेळ निश्चित करा-
आयुष्यात यश मिळवायचे असल्यास वेळेचे महत्त्व समजा. जो माणूस वेळेचा योग्य उपयोग करत असतो त्याला यश नक्कीच मिळते. असं म्हणतात की गेलेली वेळ परत येत नाही. काही लोक नको त्या कामात आपला मौल्यवान वेळ वाया घालवतात आणि त्यामध्ये आपले कौशल्य मानतात.लक्षात ठेवा की जर आपण वेळेची किंमत समजला तर ध्येय पूर्ण करण्यात काहीच अडथळे येणार नाही.नेहमी लक्षात ठेवा की कौशल्य जास्त वेळ वाया घालविण्यात नाही, तर कमी वेळ वापरण्यात आहे. वेळ वाया घालवू नये कारण वेळच आयुष्य आहे. वेळेचा चांगला आणि योग्य वापर करणे म्हणजे वेळ सांभाळणे.आपल्या कडे जे काही काम आहे. त्यांना प्राधान्यतेनुसार ठराविक वेळेत वाटप करा.अशा प्रकारे प्रत्येक काम वेळीच सुरू होऊन पूर्ण होईल. माणसाला एकावेळीच एकच काम करावे. एकत्ररित्या बरीच कामे केल्याने गोंधळ होतो आणि एकही काम वेळेवर पूर्ण होत नाही. या उलट जर आपण आपले लक्ष्य एकाच कामावर केंद्रित केले तर ते काम करताना एकाग्रता वाढते आणि काम कमी वेळात पूर्ण होते. आणि यश नक्कीच मिळते.    
 
5 नेहमी शिकत राहा -
हे खरे आहे की माणसाला आयुष्यात नेहमी शिकत राहिले पाहिजे. जे लोक यशाच्या शिखरावर आहे ते अजून देखील काही न काही शिकतच आहे. सतत शिकत राहणे हे आपल्याला अपडेट करते. माणसाला नेहमी शिकत राहावे. या मुळे त्याचा दृष्टीकोन चांगला राहतो. त्याच्या मध्ये बदल होतो आणि तो नेहमी प्रगतीच्या पायऱ्या चढत राहतो. आयुष्यात पुढे वाढायचे आहे तर नेहमी शिकत राहावे. 
शिकत राहण्याने ज्ञान वाढते.या मुळे आत्मविश्वास वाढते. आत्मविश्वास वाढल्याने आव्हानांना पूर्ण उत्साहाने सामोरी जाऊ शकतो. म्हणून नेहमी त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक राहा. जे आपल्या ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक आहे. ज्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व विकसित होईल.
शेवटी एक सांगू इच्छितो की, जास्त काळ विचलित न होता,  परिणाम माहीत नसताना धीर ठेवणे आणि केलेल्या प्रक्रियेवर विश्वास ठेवणे, आपल्या दृष्टिकोनाला आणि रणनीतीला बदलणे आणि ध्येय प्राप्तीसाठी उत्साही राहून नेहमी हे लक्षात ठेवून नवीन गोष्टींना शिकणे हा यशाचा मूलमंत्र आहे.