गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. गुरूमंत्र
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (18:15 IST)

प्रेरणा देणारे जीवन मंत्र अवलंबवा यशस्वी बना

आयुष्यात यशस्वी बनायला काही गोष्टींना आत्मसात करावे लागते. जे आपल्याला प्रेरणा देतात. या गोष्टी माणसाचे आयुष्य बदलतात. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायला काही गोष्टी अवलंबवावे. जेणे करून यश नक्कीच मिळेल.
1 बोलण्यापूर्वी विचार करा -
बऱ्याच वेळा आपण नकळत असे काही बोलून जातो ज्यामुळे आपले त्रास वाढू शकतात. या साठी आत्मनिरीक्षण करावे. बोलण्यापूर्वी एकदा तरी विचार करावा.  आपण या मुळे आपल्या दृष्टीकोनाला बदलून समस्यांना सामोरी जाऊन सहजपणे हाताळू शकतो. 
 
2 निंदा नालस्ती करू नका- 
आपल्या संवेदना आणि त्याचा उद्रेक दोन प्रकारे परिणाम करता. जर आपण एखाद्याला प्रेम, दया, करून आणि कल्याणकारी सकारात्मक विचार देता तर या मुळे आपले संबंध चांगले आणि दृढ होतील. या उलट जर आपण एखाद्याला उलट बोलता, चिडता, रागावता, त्यांच्या चुका शोधता, नकारात्मक विचार करता, निंदा नालस्ती करता आणि वाईट बोलता तर आपले संबंध त्या व्यक्तीशी तुटतात. या चिंतेत आयुष्यातून प्रेम आणि आनंद कायमचे निघून जाते. दोघांमध्ये एकमेकाला समजून घेण्याची शक्ती असावी. अहंकार आणि द्वेष नसावे.   
 
3 चांगले आत्मसात करा- 
नेहमी चांगले ग्रहण करा असं म्हणतात की चांगल्या सवयी चांगल्या मार्गावर नेतात आणि वाईट सवयी वाईट मार्गावर नेतात. सकारात्मक आणि चांगले घ्या आणि नकारात्मक सोडून द्या. आपला स्वभावच आपले गुणांना दाखवतो आनंद द्या. आपल्या स्वभावात दया, करुणा, प्रेमभाव ठेवा. 
 
4 आनंदी राहा-
कोणतीही परिस्थिती असो जीवनात आनंदी राहणे आवश्यक आहे. नेहमी असा विचार करा की आज जे आहे ते चांगलेच आहे. आयुष्याच्या प्रत्येक  क्षणाला आनंदाने हसत खेळत घालवा. असं केल्याने आपल्या आयुष्यात आनंद ,प्रेम, स्वातंत्र्य टिकून राहील. लहान लहान गोष्टींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीवर अचानक दुखी होऊ नका. असं कराल तरच कोणीही आपल्याला दुखी करू शकणार नाही. 
 
5 या गोष्टींची सवय करा- 
आयुष्यात सकारात्मक बदल आणण्यासाठी बरेच बदल करता. आयुष्यात नम्र,प्रामाणिक आणि प्रयत्नशील राहा. आयुष्यातील नवीन परिभाषा शिका. नेहमी चांगल्या सवयी अवलंबवा आणि हा विचार करा की माझ्या कडून कोणाला दुःख मिळू नये. मी कोणाचे वाईट चिंतू नये.चांगल्या गोष्टी लिहून ठेवा आणि त्यांना आत्मसात करा. असं  जर सगळ्यांनी अवलंबवले  तर जगात आणि आयुष्यात राग,द्वेष ,मत्सर ह्यांना जागा राहणार नाही  
आणि यश सहजपणे मिळवू शकाल.