संबंधित माहिती
- पार्लरमध्ये फेशियल करणे पडले महाग, डॉक्टर महिलेच्या चेहर्याची झाली वाईट अवस्था
- करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स
- माणुसकीला काळिमा, दोन श्वानांना जाणीवपूर्वक पेट्रोल टाकून जाळले
- बाप्परे, लघुशंका करत असताना हटकलं म्हणून सुरक्षारक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
- अयोध्या: रामललाच्या दरबारात भाविकांना वर्च्युअल दिवे जळायला मिळणार, योगी सरकार लवकरच वेबसाइट सुरू करणार
पिके जाळू पण मागे हटणार नाही
दिल्लीच्या सीमांजवळ तीन महिन्यांपासून सुरू असणार्या शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलक शेतकरी मागे हटणार नाहीत, पिके जाळू पण आंदोलन सुरुच ठेवू, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, पीक पेरणी आणि शेतीच्या इतर कायद्यांसाठी शेतकरी परत जातील असा गैरसमज केंद्र सरकारने करून घेऊ नये. जर त्यांनी बळजबरी केली तर आम्ही आमची पिके जाळू पण आंदोलनातून मागे हटणार नसल्याची भूमिका टिकैत यांनी मांडली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, हे आंदोलन दोन महिन्यामध्ये थंड होईल असा समज सरकारने करून घेऊ नये. आम्ही शेतीही करू आणि आंदोलनही सुरू ठेवू. यावेळी केंद्र सरकार शेतकर्यांशी चर्चा करायला तयार आहे. मग, संघटना नेते केंद्राला प्रस्ताव का देत नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना टिकैत यांनी म्हटले, आम्ही देखील केंद्राशी चर्चा करायला तयार आहोत. आम्ही प्रस्ताव यापूर्वीच दिले आहेत. यासाठी 98 लाख रुपये खर्च येईल.