दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊसामुळे भूस्खलन; ममता बॅनर्जी आज बाधित भागांना भेट देणार
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज उत्तर बंगालला भेट देऊन या भागातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मिरिक आणि दार्जिलिंग टेकड्यांमध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. भूस्खलनामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली आहे, अनेक रस्ते खराब झाले आहे, वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे आणि शेकडो पर्यटक अडकले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाधित भागांना भेट देतील. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरसाली, जसबीरगाव, मिरिक बस्ती, धार गाव (मेची), नागरकाटा आणि मिरिक तलाव परिसरात अनेक ठिकाणी मृत्यूची नोंद झाली आहे. शेजारच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील नागरकाटा येथे भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "मिरिक, दार्जिलिंग आणि जलपाईगुडीमध्ये आतापर्यंत एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे." मृतांचा आकडा वाढू शकतो. असे देखील ते म्हणाले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितांना भरपाईची घोषणा केली, परंतु रक्कम निश्चित केली नाही. त्या म्हणाल्या की त्या आज उत्तर बंगालला भेट देऊन या प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेतील, जिथे मोठ्या संख्येने पर्यटक देखील प्रभावित झाले आहे.