शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2023 (22:35 IST)

Odisha Train Accident: CBI ने सुरू केला ओडिशा ट्रेन अपघाताचा तपास

odisha train accident
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी सुरू केली आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीआयच्या 10 सदस्यीय पथकाने सोमवारी बालासोर रेल्वे अपघातस्थळी भेट दिली आणि अपघाताची चौकशी सुरू केली. ईस्ट कोस्ट रेल्वे अंतर्गत खुर्द रोड विभागाचे डीआरएम रिंकेश रे म्हणाले की, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार बालासोर येथील रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. मात्र सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
 
सोमवारी तीन जखमींचा मृत्यू झाल्यानंतर ओडिशा रेल्वे अपघातातील अधिकृत मृतांची संख्या 278 वर पोहोचल्याचे रेल्वेने सांगितले. तथापि, ओडिशा सरकारच्या आकडेवारीनुसार, मृतांची संख्या अद्याप 275 आहे. खुर्द रोड विभागाचे डीआरएम, रिंकेश रे म्हणाले की, 2 जून रोजी तीन गाड्यांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात 278 लोकांचा मृत्यू झाला आणि 1100 लोक जखमी झाले.
 
दुसर्‍या दिवशी मृतांची संख्या २८८ इतकी नोंदवली गेली, परंतु ओडिशा सरकारने रविवारी हा आकडा 275 वर सुधारला. त्यात काही मृतदेहांची दोनदा मोजणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, त्यांच्या राज्यातील 61 लोकांचा अपघातात मृत्यू झाला असून 182 लोक अद्याप बेपत्ता आहेत. परंतु ओडिशा सरकारने रविवारी आकडेवारी सुधारित केली आणि 275 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
 
278 मृतदेहांपैकी 177 मृतदेहांची ओळख पटली आहे, तर 101 मृतदेहांची ओळख पटणे बाकी असून हे मृतदेह सहा वेगवेगळ्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. ते म्हणाले की, बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी रेल्वेने ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये लोकांना तैनात केले आहे.
 
मृत लोकांशी संबंधित दावे प्राधान्याने निकाली काढण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून पीडितांच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत मिळू शकेल. तपन सिंघल, चेअरमन, जनरल इन्शुरन्स कौन्सिल, म्हणाले, “पीडितांना मदत करण्यासाठी, ग्राहकांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विमा कंपन्यांपर्यंत पोहोचणे सोपे करण्यासाठी आम्ही एक समर्पित हेल्पलाइन आणि डिजिटल क्षमता तयार केली आहे. सिंघल म्हणाले की, विमा कंपन्यांनी विशेष टीम तयार केल्या आहेत. जेणेकरुन असे दावे जलद करता येतील आणि विमाधारकाचे दावे कोणत्याही अडचणीशिवाय आणि लवकरात लवकर निकाली काढता येतील. SBI Life ने पॉलिसीधारकांच्या सोयीसाठी 1800 267 9090हा टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे. दावे निकाली काढण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. इतर कंपन्यांनीही अशाच उपाययोजना केल्या आहेत.
 



Edited by - Priya Dixit