संबंधित माहिती
- पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची तातडीची मदत
- कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार – मुख्यमंत्री
- राज्य सरकार कडून पूरग्रस्तांसाठी मदत
- केंद्र सरकारकडून कोकणातील नागरिकांना योग्य मदत पुरवणार
- मग ओबीसी आरक्षणासाठी डेटा का दिला जात नाही?, छगन भुजबळ यांचा सवाल
एनडीआरएफच्या निकषानुसार मदत दिली जाणार
राज्यातील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठीकत घेण्यात आला. या बैठकीत पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसंदर्भातही निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार आता सुरूवातीला एनडीआरएफच्या निकषानुसार तातडीची मदत दिली जाणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आता सुरूवातील तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये रोखीने मदत देण्याचा निर्णय झाला आहे आणि उर्वतरीत मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे घराचं किंवा आणखी काही नुकसान असेल, ही सगळी मदत एनडीआरएफच्या निकषानुसार दिली जाईल.
तसेच, नुकसानीचे एकूण आकडेवारी आल्यानंतर व पूर्ण आढावा आल्यानंतर अधिकची मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे. अशी देखील एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
