1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. When will the Maharashtra monsoon arrive again said weather experts

महाराष्ट्र मान्सून पुन्हा कधी येणार, हवामान तज्ज्ञांनी सांगितले

monsoon
यंदा मान्सून ने वेळेच्या 12 दिवसापूर्वीच महाराष्ट्रात प्रवेश केला. दरवर्षी 7 जूनच्या सुमारास राज्यात मान्सून येतो. तर मुंबईला 11 जून रोजी हजेरी लावतो. यंदा मुंबई,कोकण,विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस ओसरला असून अनेक भागात उकाडा जाणवत आहे. 
राज्यात 12 ते 15 जून दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.  12 ते 15 जून दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे, त्यामुळे तोपर्यंत नांगरणी सुरू ठेवा. सध्या भारी जमिनीत पेरणी करणे फायदेशीर ठरेल.जमिनीत पेरणी करताना घाई करू नका. मुसळधार पावसाची वाट पहा, असा सल्ला ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.
डॉ. साबळे यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी मे महिन्यात अतिवृष्टीची नेमकी कारणे, राज्यात यावर्षी मान्सून हंगामात 106 टक्क्यांहून अधिक पाऊस कसा पडेल, जून-जुलैमध्ये राज्यातील कोणत्या भागात पावसाची कमतरता भासेल आणि शेतकऱ्यांनी आता काय करावे याबद्दल माहिती दिली.
 
जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी 106 टक्के पाऊस पडेल.
कमी वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तापमान यामुळे जून आणि जुलैमध्ये अकोला, धुळे, राहुरी, परभणी, कोल्हापूर, पडेगाव, निफाड येथे व्यापक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.
दापोली, पुणे, सोलापूर, नागपूर, धुळे, जळगाव आणि कराडमध्ये कमी दुष्काळी कालावधी राहण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल.
कमी दिवसांत जास्त पाऊस पडेल आणि कधीकधी पावसाळ्यात व्यापक दुष्काळ पडेल.अशी शक्यता साबळे यांनी वर्तवली आहे. 
सध्या राज्यात मान्सून कमकुवत झाला असून पुढील 6-7 दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तवली आहे. अजून काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Edited By - Priya Dixit  
 
पुढील लेख
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि टिकटॉक स्टार सना युसूफची गोळ्या घालून हत्या