संबंधित माहिती
- कमी बजेटमध्येही हिवाळ्यात हिमाचल प्रदेशातील या ठिकाणांना भेट द्या
- यक्ष आणि गंधर्वांनी बांधलेले गुहा मंदिर आजही येथे आहे
- Travel Tips and Tricks: कोणत्याही हिल स्टेशनला जातांना या चुका करू नका
- Celebrate New Year 2023 नवीन वर्ष साजरे करण्यासाठी ही 5 ठिकाणे उत्तम आहेत, येथील सौंदर्य पाहून तुम्हीही वेडे व्हाल
- Honeymoon Destinations: हिवाळ्यात हनिमूनला जाण्यासाठी काही रोमँटिक ठिकाण
Kunwara Kila Alwar: एक असा किल्ला जिथे कधीही युद्ध झाले नाही, जाणून घ्या वैशिष्टये
History of Kunwara Kila Alwar : भारत हा एक ऐतिहासिक वारसा आहे. येथे तुम्हाला वर्षानुवर्षे बांधलेले विविध प्रकारचे किल्ले, समाधी, मंदिरे पाहायला मिळतील. त्याच वेळी, त्यांचा एक वेगळा आणि विशेष इतिहास आहे. या देशाच्या परंपरेत असे अनेक किल्ले आहेत, जे त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात.भारतातील सर्वच किल्ले असे आहेत ज्यांचा मागचा इतिहास वेगळा आहे. भारतातील अनेक किल्ले त्यांच्या युद्धाची गवाही देतात.पण आज आम्ही अशा एका किल्ल्याची माहिती देत आहोत ज्या किल्ल्यावर एकही युद्ध झाले नाही. हा किल्ला आहे राजस्थानच्या अलवरचा कुंवारा किल्ला किंवा बाला किल्ला. ह्याला 'अलवर चा किल्ला देखील म्हणतात.
कुंवरा किल्ला राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात आहे. त्यामुळे अनेक लोक याला 'अलवरचा किल्ला' म्हणतात. जर तुम्ही अलवर जिल्ह्यात पाहिले तर हा सर्वात खास आणि जुना किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम हसन खान मेवाती यांनी 1492 मध्ये सुरू केले. हे त्याच्या भव्य स्ट्रक्चरल डिझाइनसाठी देशभर प्रसिद्ध आहे.
या खास किल्ल्याची तटबंदी हिरवीगार मैदानातून जाणाऱ्या डोंगरावर पसरलेली आहे. या किल्ल्याचे नैसर्गिक दृश्य तुम्हाला त्याकडे आकर्षित करते. या किल्ल्याचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक लांबून येतात. एक काळ असा होता की किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी परिसरातील एसपींची परवानगी घ्यावी लागत होती, परंतु आता तसे नाही. आता तुम्ही येथे कधीही जाऊ शकता.
विशेष म्हणजे इतिहासात या किल्ल्यावर कधीही युद्ध झाले नाही. त्यामुळे याला कुंवरा किल्ला म्हणतात. हा किल्ला 5 किलोमीटर लांब आणि सुमारे 1.5 किलोमीटर रुंद आहे. या किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी एकूण 6 दरवाजे बांधले आहेत, ज्यांची नावे सुरज पोळ, जय पोळ, चांद पोळ, लक्ष्मण पोळ, कृष्ण पोळ आणि अंधेरी पोळ आहेत. मुघल शासक बाबर आणि जहांगीर यांनी या किल्ल्यात मुक्काम केल्याचे सांगितले जाते.
या किल्ल्याच्या भिंतींना 446 छिद्रे आहेत, जी शत्रूंवर गोळ्या झाडण्यासाठी खास बनवण्यात आले होते. या छिद्रांमधून 10 फुटांच्या बंदुकीतून देखील गोळी मारता येते.याशिवाय शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यात 15 मोठे आणि 51 छोटे बुरुज बांधण्यात आले आहेत.
या किल्ल्याच्या आत ज्या खोलीत जहांगीर राहिला, ती खोली आज 'सलीम महाल' म्हणून ओळखली जाते. या किल्ल्यात एक मौल्यवान खजिना दडलेला असल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की या खजिनाची संपत्ती देव कुबेर यांची आहे, परंतु हा खजिना एक रहस्य आहे, कारण आजतायागत कोणालाही तो सापडलेला नाही.
