suvichar

तीन डोळ्यांचा गणपती; रणथंबोरचे त्रिनेत्र गणेश मंदिर

बुधवार, 3 सप्टेंबर 2025 (07:30 IST)
RajsthanTourism : भक्ती, इतिहास आणि निसर्गाच्या संगमासह गणेश उत्सव साजरा करायचा असेल, तर राजस्थानच्या रणथंबोर किल्ल्यातील त्रिनेत्र गणेश मंदिराला भेट देणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. हे मंदिर केवळ त्याच्या ७०० वर्षांहून अधिक जुन्या इतिहासासाठी प्रसिद्ध नाही, तर येथे विराजमान असलेल्या भगवान गणेशाच्या अद्वितीय तीन डोळ्यांच्या मूर्तीमुळे संपूर्ण भारतात त्याची एक वेगळी ओळख आहे.तसेच त्रिनेत्र गणेश मंदिर राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि अरवली डोंगराच्या मधोमध वसलेले आहे, देश-विदेशातील लोकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र असलेला रणथंबोर किल्ल्यात आहे.

त्रिनेत्र गणेश मंदिराचा इतिहास-
रणथंबोरचा राजा हमीरदेव चौहान याचे दिल्लीचा शासक अलाउद्दीन खिलजीशी युद्ध सुरु होते. युद्ध बराच काळ चालल्यामुळे राजा हमीर देव याला आवश्यक असलेल्या गोष्टी हळूहळू संपत होत्या, म्हणून राजा हमीर देव यांनी भगवान गणेशाला आळवले आणि युद्ध लवकर सम्पस्थत  जेणेकरून अल्लाउद्दीन खिलजीसोबतचे त्यांचे युद्ध लवकर संपुष्टात यावे आणि त्यांच्या राज्यात कसलीही कमतरता भासू नये. अशी इच्छा केली. त्याच रात्री गणपती राजा हमीर देव यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी आश्वासन दिले की युद्ध लवकरच संपेल आणि त्याच रात्री रणथंबोर किल्ल्याच्या भिंतीवर गणेशजींची तीन डोळ्यांची मूर्तीची स्थापना केली गेली. युद्ध संपल्यानंतर लगेचच राजा हमीर देव याने विंध्याचल आणि अरावलीच्या टेकड्यांमध्ये गणेशाची मूर्ती स्थापित केली आणि 1579 फूट उंच असलेल्या मंदिराचे बांधकाम केले.तसेच जगातील हे एकमेव मंदिर आहे जिथे तीन डोळ्यांची गणेशाची मूर्ती आहे. त्रिनेत्र गणेश मंदिरात गणेशजींची पत्नी रिद्धी-सिद्धी आणि त्यांची मुलं शुभ-लाभ यांचीही मूर्ती आहे. तसेच या मंदिरात गणेशजींचे वाहन असलेले मूषकराज देखील आहे.

रणथंबोर गणेश मंदिर गणेशोत्सव
दरवर्षी गणेश चतुर्थीला येथे एक मोठा लक्ष्मी मेळा आयोजित केला जातो, ज्यामध्ये देश-विदेशातून लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. या काळात संपूर्ण रणथंबोर किल्ला "गणपती बाप्पा मोरया!" च्या जयघोषाने दुमदुमून जातो. भक्तांचा उत्साह आणि भक्ती पाहण्यासारखी आहे. यावेळी मंदिर परिसरात भजन, कीर्तन आणि भंडारा आयोजित केला जातो, ज्यामुळे येथील वातावरण पूर्णपणे भक्तीमय होते.

निमंत्रणाची अनोखी परंपरा
येथे गणेश उत्सवाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे थेट गणेशजींना पोस्टाने पाठवलेली पत्रे! भक्त त्यांच्या लग्नाची पत्रिका, नवीन कार्याच्या सुरुवातीचे निमंत्रण आणि त्यांच्या शुभेच्छा लिहून थेट भगवान गणेशाला पाठवतात. ही पत्रे पुजारी बाप्पाच्या चरणी ठेवतात. ही परंपरा गणेशजींना कुटुंबाचा एक भाग मानतात आणि ते प्रत्येक आनंदात सामील आहेत याचे प्रतीक आहे. या गणेशोत्सवात, रणथंबोरला या आणि त्रिनेत्र गणेशजींचे दर्शन घ्या आणि त्यांच्या असीम कृपेचा अनुभव घ्या.

त्रिनेत्र गणेश मंदिर रणथंबोर जावे कसे?
त्रिनेत्र गणेश मंदिर सवाई माधोपूर जिल्ह्यात असून ट्रेन आणि बसने पोहोचणे अगदी सोपे आहे.
विमान मार्ग- रणथंबोर येथील त्रिनेत्र गणेश मंदिरासाठी सर्वात जवळचे विमानतळ जयपूरमध्ये आहे, जयपूर विमानतळावरून तुम्ही बस किंवा ट्रेनने किंवा कॅबने सवाई माधोपूरला पोहोचू शकता.
रेल्वे मार्ग-सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सवाई माधोपूर आहे, जिथे तुम्ही देशातील प्रमुख शहरांमधून रेल्वे मार्गांशी जोडलेले आहे.  
रस्ता मार्ग-सर्वात जवळचे बसस्थानक सवाई माधोपूर आहे, जिथे राजस्थानच्या इतर भागातून येण्यासाठी नियमित बसेस धावतात.
ALSO READ: गणपतीपुळे मंदिर इतिहास, गणपती आरती उत्सव पूर्ण माहिती

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

धमाल ४: हास्याचा रोलरकोस्टर परत आला आहे

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

प्रसिद्ध ब्रिटिश गायिका लॉरेन बेनेट यांचे वयाच्या ३७ व्या वर्षी निधन

"मुंबई-पुण्याजवळची ५ 'हिडन' ठिकाणे; जिथे पावसाळ्यात गर्दीशिवाय निसर्गाचा आनंद घेता येईल

राजकुमार रावच्या 'दादा' मोठी बातमी समोर, चित्रपटाचा फर्स्ट लूक सौरव गांगुलीच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार?

पुढील लेख
Show comments