शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (15:48 IST)

लाल सिंह चड्ढा च्या बहिष्काराचा वाद आमिर खाननेच सुरू केला: कंगना राणौतचा दावा

Amir khan
आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून त्याआधी आमिरने चाहत्यांना एक स्पष्टीकरणही दिले आहे. मला भारत आवडतो आणि प्रेक्षकांनी त्याच्या चित्रपटावर बहिष्कार घालू नये, असेही आमिरने म्हटले आहे. मात्र याच दरम्यान कंगना राणौतने असा खळबळजनक दावा केल्याने संपूर्ण कथाच उलटी झाली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आमिर खान या #BoycottLaalSinghCaddha वादाचा मास्टरमाइंड असल्याचे वर्णन केले आहे. कंगनाचे म्हणणे आहे की, आमिर खानने त्याचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी जाणूनबुजून हा वाद सुरू केला.
 
कंगना राणौत म्हणते की आमिरला भीती वाटते की त्याचा चित्रपट फ्लॉप होईल आणि म्हणूनच त्याने स्वतःच हा वाद सुरू केला. बुधवारी कंगना रणौतने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'मला वाटते की आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाबाबत सर्व नकारात्मक चर्चा खुद्द आमिर खाननेच सुरू केल्या आहेत. 'भूल भुलैया 2'चे नाव न घेता कंगनाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'या वर्षात आतापर्यंत कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वेलशिवाय कोणताही चित्रपट हिट झाला नाही. फक्त भारतीय संस्कृतीशी संबंधित दक्षिण भारतीय चित्रपट चांगले चालतात किंवा ते चित्रपट ज्यात स्थानिक चव असते.
 
कंगनाने असहिष्णुता आणि हिंदू धर्माचा उल्लेख का केला?
कंगनाचा हा दावा अशावेळी समोर आला आहे जेव्हा आमिर खानचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडिओ असाही आहे की जेव्हा त्याने असहिष्णुतेच्या चर्चेदरम्यान आपल्या पत्नीला या देशात राहण्याची भीती वाटते. आमिर खानच्या 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'पीके'मध्ये एक पात्र जेव्हा भगवान शिवाच्या वेशभूषेत दिसले आणि टॉयलेटमध्ये दाखवण्यात आले तेव्हा बराच गोंधळ झाला होता. मग 'पीके'लाही हिंदूविरोधी चित्रपट म्हटले गेले. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या गोष्टींचा उल्लेख केला आहे.