1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2019-20
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (12:45 IST)

Budget 2019 LIVE Updates: पियूष गोयल यांच्याकडून अर्थसंकल्प अर्थसंकल्प संसदेत सादर

स्वच्छ भारतासाठी लक्षणीय काम
- मोदी... मोदी... घोषणेनं सभागृह दणाणलं
- एका तासाच्या आत १ करोड रुपयांचं कर्ज मंजूर करता येईल - पीयूष गोयल
- बालविकास धोरणासाठी २७,५८४ कोटी
- ग्रामीण अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी 'मनरेगा' योजनेला अधिक निधी उपलब्ध करून देणार
- एका तासाच्या आत १ करोड रुपयांचं कर्ज मंजूर करता येईल - पीयूष गोयल
- ग्रामीण अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी 'मनरेगा' योजनेला अधिक निधी उपलब्ध करून देणार
- २०२२ मध्ये मानवाला अंतराळात पाठवणार
- सेंद्रीय शेतीवर भर
- स्वच्छ नद्या, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचं उद्दिष्ट
- भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांवर भर देणार
- इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यानं देश स्वावलंबी व्हायला मदत होईल
- परदेशातून इंधन आयात करणं कमी होईल
- पुढच्या पाच वर्षांत पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट 
- नव्या घरांवरचा जीएसटी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न... मात्र हा निर्णय अद्याप विचाराधीन आहे... जीएसटी परिषद घेणार निर्णय 
- जानेवारी २०१९ मध्ये जीएसटी वसुली आत्तापर्यंत १ लाख करोडहून अधिक 
- एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी नोटबंदीनंतर पहिल्यांदा आयकर भरला 
- जीएसटी अंतर्गत घर खरेदीदारांना कसा फायदा मिळेल याचा अभ्यास मंत्रीमंडळाकडून केला जातोय 
- स्वातंत्र्यानंतर 'जीएसटी' ही करप्रणालीत झालेली सर्वात मोठी सुधारणा
- 'पंतप्रधान श्रमयोगी मानधन' ही पेन्शन योजना सुरू होणार... १० हजार कामगारांना होणार लाभ 
- ईपीएफओकडून कामगारांना सात हजारांपर्यंत बोनस देण्याचा निर्णय... 
- असंघटीत कामगारांना कमीत कमी ३ हजार रुपये पेन्शन... वयाच्या ६० व्या वर्षानंतर मिळणार फायदा
- नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास आर्थिक मदत २.५० लाखांवरून ६ लाखांवर केली
- ग्रॅज्युईटी १० लाखांवरून २० लाखांवर नेली
- सातवं वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर सरकारनं लगेचच या शिफारशी लागू केल्या
- पाच वर्षांत औद्योगिक शांतता निर्माण केली
- कामगारांचं कल्याण हाच सरकारचा हेतू
- कामगारांकडेही सरकारचं विशेष लक्ष
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा :  शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपयांची रक्कम थेट जमा होणार
- २ हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा
- तीन हफ्त्यांमध्ये जमा होणार रक्कम
- १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार... १ डिसेंबर २०१८ पासून योजना लागू
- शेतकऱ्यांसाठी ७५ हजार कोटींचं पॅकेज जाहीर
घोटाळेबाजांना आमच्या सरकारमुळे चाप बसला, त्या घोटाळेबाजांची आम्ही संपत्ती जप्त केली आहे- पीयूष गोयल
आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत- पीयूष गोयल
महागाई कमी झाली नसती तर प्रत्येक कुटुंबाला आजच्या पेक्षा ३५ ते ४० टक्के जास्त खर्च करावा लागला असताः पीयूष गोयल
भारताची अर्थव्यवस्था वेगानं विकास करत आहे- पीयूष गोयल
गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ- पीयूष गोयल
यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला- पीयूष गोयल
- देशातील विदेशी गुंतवणुकीत वाढ
- बँकांच्या फेर महसुलीची व्यवस्था पूर्ण केली
- बँकिंग व्यवस्थेमध्ये कमालीच्या सुधारणा
- तीन बँकांवरील निर्बंध हटवले... अन्य बँकांवरील निर्बंधही लवकरच हटवले जातील
- बांधकाम क्षेत्रात 'रेरा'सह अन्य कायद्यांमुळे पारदर्शकता आली
- अगोदर छोट्या व्यावसायिकांवर ऋण फेडण्याचा दबाव होता आता मोठ्या व्यावसायिकांनाही ऋण फेडावं लागतंय  
शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि छोटे व्यापारी यांना आकृष्ट करण्यासाठी सरकारकडून नव्या तरतुदी  
- महसुली तूट ६ टक्क्यांवरून ३.४ टक्क्यांपर्यंत खाली आणली
- जीएसटीमुळे देशाच्या कररचनेत सुधारणा
- दहशतवाद, भ्रष्टाचाराला आळा घातला 
- २०२० पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार
- गेल्या पाच वर्षांत देशाला प्रगती पथावर आणलं
- मूलभूत सोई-सुविधांवर सरकारचा सर्वाधिक भर
- भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था
- महागाईचा दर कमी झाला
- आमच्या सरकारनं महागाईचं कंबरडं मोडलं
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ
- पीयूष गोयल यांनी अरुण जेटलींच्या स्वास्थ्य सुधारणेसाठी दिल्या शुभेच्छा
- पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पाच्या वाचनाला केली सुरुवात
- केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी
शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि छोटे व्यापारी यांना आकृष्ट करण्यासाठी सरकारकडून नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत...
यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेचा बोजा वाढला - गोयल
भारत वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था - गोयल
जीएसटी लागू करणं सरकारसाठी मोठं पाऊल - गोयल 
महागाई कमी झाली नसती तर प्रत्येक कुटुंबाला आजच्यापेक्षा ३५ ते ४० टक्के जास्त खर्च करावा लागला असता -  पीयूष गोयल 
गेल्या पाच वर्षांत देशाला प्रगतीपथावर आणलं - गोयल
सरकारने महागाईचं कंबरडं मोडलं - गोयल 
अरुण जेटली यांच्या प्रकृतीसाठी गोयल यांनी दिल्या शुभेच्छा

- औषधं आणि उपकरणांच्या किंमती कमी केल्या

- गरीब आणि श्रीमंतांमधली दरी कमी करण्यासाठी काम केलं

- गरीब, मध्यमवर्गियांना स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार करोड 

- गावांमध्येही शहरासारख्याच योजना उपलब्ध करून देणार

- स्वच्छ भारतासाठी लक्षणीय काम

- देशातील विदेशी गुंतवणुकीत वाढ