गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (10:22 IST)

Coronavirus Update: कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, 24 तासात 11,919 नवीन रुग्ण आढळले; 470 जणांचा मृत्यू

गुरुवारी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 11 हजार 919 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 470 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या भारतात १ लाख २८ हजार ७६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नवीन आकडेवारीसह देशातील कोविड-19 रुग्णांची संख्या 3 कोटी 44 लाख 78 हजार 517 वर पोहोचली आहे. तर 4 लाख 64 हजार 623 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले की, अँटी-कोविड-19 लसीचा पूर्ण डोस घेतलेल्या लोकांच्या संख्येने देशात प्रथमच एकच डोस घेणाऱ्यांची संख्या ओलांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'जनभागीदारी' आणि 'संपूर्ण सरकारी दृष्टीकोन', जनतेचा सरकारवरील विश्वास आणि 'हर घर दस्तक' अभियानामुळे हे यश मिळाले आहे, असे ते म्हणाले.
 
एका निवेदनात मांडविया म्हणाले, "देशव्यापी लसीकरण कव्हरेजमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठून, प्रथमच लसीचा पूर्ण डोस घेतलेल्या लोकांची संख्या लसीचा फक्त एक डोस मिळालेल्या लोकांपेक्षा जास्त झाली आहे."
 
महाराष्ट्रात बुधवारी 32 जणांचा मृत्यू झाला, महाराष्ट्रात कोविड-19 चे 1,003 नवीन रुग्ण आढळून आले असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील एकूण संक्रमित आणि मृतांची संख्या अनुक्रमे 66,26,875 आणि 1,40,668 झाली आहे. त्याचवेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात दिवसाला लसीचा किमान एक डोस घेणाऱ्यांची संख्या सात कोटींच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या 3.46 कोटी आहे.
 
केरळमध्ये 6,849 आणि आंध्र प्रदेशात 230 नवीन रुग्ण आढळले आहेत, केरळमध्ये 6,849 कोविड-19 आणि आंध्र प्रदेशात 230 नवीन रुग्ण आढळले आहेत . राज्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. केरळमध्ये कोविड-19 चे 6,849 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, बुधवारी एकूण संक्रमित लोकांची संख्या 50,77,984 झाली. त्याच वेळी 388 रुग्णांचा मृत्यू झाला, त्यानंतर मृतांची संख्या 36,475 झाली.
 
आंध्र प्रदेशात गेल्या 24 तासांत संसर्गाची 230 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 20,70,516 झाली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असे सांगण्यात आले की, गेल्या 24 तासांत 346 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत, त्यानंतर निरोगी लोकांची संख्या 20,53,480 झाली आहे. आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा 14,421 वर पोहोचला आहे. येथे २ हजार ६१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत