Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोविड-१९ परत येत आहे का? मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्यमंत्र्यांचे विधान समोर आले

Updated: बुधवार, 21 मे 2025 (09:10 IST)
ALSO READ: नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी, ५ वर्षांत ३५ लाख घरे तयार होतील
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण आढळले आहे. या प्रकरणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाशराव यांचे एक विधान समोर आले आहे. जानेवारी २०२० पासून, कोरोनाव्हायरस SARS-CoV-2 मुळे होणारा कोविड-१९ साथीचा रोग जगभरात पसरला आहे आणि जगभरात लाखो लोकांचा बळी गेला आहे. पुन्हा एकदा कोरोना विषाणू शांतपणे आपले पाय पसरवत आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगसह काही आशियाई देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहे. देशात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि केरळमधून काही प्रकरणे नोंदवली गेली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ५३ सक्रिय कोरोना रुग्ण आढळले आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात आले आहे. 
ALSO READ: महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस, ४ दिवसांत मान्सून केरळमध्ये पोहोचेल
तसेच, महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर म्हणाले की, कोरोनाच्या प्रसाराच्या बातम्यांमुळे लोक चिंतेत आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की घाबरू नका. कोरोना आता सामान्य आहे, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे आणि भविष्यातही ही परिस्थिती कायम राहील, घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार सतर्क आहे आणि जर आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवली तर आम्ही तयार आहोत. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. काही रुग्ण येतील, पण कोरोना सामान्य आहे, परिस्थिती पूर्वीसारखी नाही. रुग्णांनी सामान्य राहणे आवश्यक आहे, पूर्वीसारखे घाबरू नये, रुग्णांची ओळख उघड करण्याची गरज नाही.
ALSO READ: बहाणा बनवून परदेशात फिरायला गेल्याबद्दल सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त निलंबित;
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

जिओ प्राईम: एका वर्षासाठी फक्त ₹300, महागड्या रिचार्जची चिंता नाही! २० ऑगस्टपासून सबस्क्रिप्शन उपलब्ध, ₹299 चा प्लॅन सुरूच राहणार

LIVE: गिरीश महाजन यांची नाशिकचे तर भरत गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती

अमरावतीत दोन मोटरसायकलची भीषण टक्कर; लहान बाळासह दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

पालकमंत्री पदाचा वाद अखेर मिटला, गिरीश महाजन यांची नाशिकचे पालकमंत्री तर भरत गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती

नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून सख्ख्या दोन बहिणींचा मृत्यू

पुढील लेख
Show comments