उपवासाचे अनारसे  
					
										
                                       
                  
                  				  साहित्य :-
	1. जरुरीप्रमाणे वरई तांदूळ
	2. साखर किंवा गूळ
	3. खसखस
	4. तूप.
	 
	कृती :-
				  													
						
																							
									  
	- वरई तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावेत. मग उपसून स्वच्छ कपड्यावर अर्धवट वाळवावे. - नंतर खलबत्त्यात चांगले बारीक कुटून घ्यावेत. यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे. झाकून ठेवावे.
				  				  
	- नंतर दुसरे दिवशी नेहमी अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. त्यावर खसखस लावावी.
	- लालासर रंगावर तळून घ्यावेत. सुंदर दिसतात. आणि लागतातही चविष्ट.