निर्माता - रंगिता नंदी, प्रीतिश नंदी दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी संगीत - संदेश शांडिल्य कलाकार - मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, अनुपम खेर, एजाज खान, चारू शर्मा, अनिल कुंबले (विशेष भूमिका)
क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ आहे आणि मुलांनाच फार आवडतो असा समज आहे पण, मुली आणि महिलांनाही किक्रेट तेवढेच आवडते. 'मीराबाई नॉट आउट' ची नायिका मीराबाई आचरेकरही अशीच क्रिकेटवेडी आहे.
IFM
विश्वप्रेम विद्यालयात मीरा मुलांना गणिताचा विषय शिकवते. तीचे क्रिकेटवर आणि क्रिकेटपटू अनिल कुंबलेवर प्रेम आहे, म्हणून ती अविवाहीत रहाते. मुंबईच्या गोंगाटात मीराबाई एका छोट्याशा घरात राहत असते. क्रिकेट सामन्यांवेळी भारतीय क्रिकेट संघ जिंकण्यासाठी ती नेहमीच प्रार्थना करत असते. तिच्या या क्रिकेटवेडामुळे घरचे लोक चांगलेच त्रस्त झालेले असतात.
मीराचा भाऊ मनोजही क्रिकेटवेडा आहे. रंणजी सामने खेळणारा मनोज जेव्हा वानखेडे स्टेडियमवर सामना असेल तेव्हा आपल्या बहिणीसह सामाना बघायला जाण्याचा प्लॅन त्याला करावला लागत असतो. तेव्हा ती शाळा सोडून सामाना बघायला जाते.
मीराच्या घरातील लोकांना आता तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली आहे. एकदिवस डॉ. अर्जुन सचदेवा यांच्याशी त्यांची भेट होते. सातत्याच्या भेटीनंतर त्याचे प्रेमात रूपांतर होते. जीवनामध्ये क्रिकेटव्यतिरीक्त भरपूर काही आहे, याची जाणीव मीराला होऊ लागते.
आपले लग्न क्रिकेटशी झाले असल्याचे मीराबाई अर्जुनला सांगते. आपल्या क्रिकेटप्रेमाबाबत अर्जुनला सर्वकाही सांगून टाकते. मीराच्या अश बोलण्यावर अर्जुनचे वडिल खुश नसतात. यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडतात.
या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. चंद्रकांत यांनी हा चित्रपट अनेक दिवसांपूर्वी पुर्ण केला होता आणि तो प्रदर्शित होत आहे. चित्रपटादरम्यान अनिल कुंबलेने निवृत्ती घेलत्याने या चित्रपटासाठी त्यान पुसेसा वेळ दिला आहे. मंदिरा खरोखरच क्रिकेटप्रेमी आहे त्यामुळे तिची निवड करण्यात आली आहे.
चित्रपटाची प्रसिध्दी करताना मंदिरा आणि अनिल कुंबले यांच्यातील रोमांस दाखविण्याचा प्रयत्न झाल्याने निर्माता-दिग्दर्शकावर कुंबळे नाराज असल्याचे बोलले जात आहे.