संबंधित माहिती
- भारतव्यतिरिक्त हा देशही ट्विटरवर संतप्त आहे, अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे
- इस्रायलमध्ये सत्तेसाठी ’महाविकास आघाडी’चा फॉर्म्युला, बेज्यामिन नेतान्याहू यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न
- PNB SCAM : तुरूंगात असलेल्या मेहुल चोकसीला मोठा धक्का बसला, डोमिनिका कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
- कोरोना व्हायरस व्हेरियंट: WHO नं कोव्हिडच्या 10 व्हेरियंटचं केलं नामकरण, भारतातील व्हेरियंटला काय नावं?
- COVID-19: व्हिएतनाममध्ये सापडलेल्या कोरोनाचे वेरिएंट चिंता वाढवीत आहे, हवेत खूप जलद पसरतात
भारतानं रोडमॅप समोर ठेवावा, चर्चेला तयार - इम्रान खान
भारतानं काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा देण्याच्या दृष्टीने रोडमॅप ठेवल्यास चर्चा करायला तयार आहोत, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केलं.
काश्मीरवरील नियंत्रणावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्षानुवर्षे वाद सुरू आहे. 2019 मध्ये भारतानं काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढला आणि या वादाला नव्या चर्चेचं रूप आलंय.
"जर रोडमॅप असेल, तर होय, आम्ही चर्चेला तयार आहोत," असं इम्रान खान यांनी इस्लामाबादमधील त्यांच्या शासकीय निवासस्थानी रॉयटर्सशी बोलताना म्हटलं.
"संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव आणि आंतरराष्ट्रीय कायद्याविरोधात घेतलेले बेकायदेशीर निर्णय मागे घेण्यासाठी अशी पावलं उचलू, असा काही रोडमॅप असेल, तरच ते स्वीकारार्ह आहे," असंही इम्रान खान यांनी नमूद केलं.
भारतीय पराष्ट्र मंत्रालयानं अद्याप इम्रान खान यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली नाही.
