Dharma Sangrah

हार्दिक पटेलला भर सभेत मारले हे आहे खरे कारण

शनिवार, 20 एप्रिल 2019 (07:13 IST)
गुजरात येथे भर प्रचार  सभेत काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली घटना घडली आहे. या सर्व प्रकारामुळे  सभेत चांगलाच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात हार्दिकला कानशिलात लगावण्यामागचे नेमके कारण काय ? चर्चेला ऊत आला होता. मात्र त्या मारणाऱ्या अज्ञात व्यक्तीने उलट सुलट सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम देत कानशिलात लगावण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. 
 
कानाखाली मारणाऱ्या या  व्यक्तीचे नाव तरूण गज्जर असे असून,  गज्जर याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, जेव्हा पाटीदार समाजाचे आंदोलन गुजरात येथे  सुरू होते. त्यावेळी माझी पत्नी गर्भवती होती. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतांना, पाटीदार समाजाच्या सुरू असणाऱ्या आंदोलनामुळे मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याचवेळी मी हार्दिकला मारण्याचा निर्णय घेतला होता. मला त्याला कोणत्याही परिस्थितीत धडा शिकवायचा होता. म्हणून भर सभेत त्याच्या कानशिलात लगावली. गज्जर पुढे म्हणाला की, जेव्हा अहमदाबाद येथे मेळावा सुरू होता त्यावेळी मी माझ्या मुलासाठी औषधे घेण्यास बाहेर गेलो,  त्यावेळी सुरक्षा म्हणून सर्व दुकाने बंद ठेवली होती. मात्र हे सर्व बंद असण्या मागे हार्दिकचा हात होता. तो पाहिजे तेव्हा गुजरात बंद करण्याचे आदेश देत असतो. तो गुजरातचा हिटलर आहे. स्वतःला काय समजतो? असा संतप्त सवालदेखील गज्जर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे हार्दीकला का मारले आता समोर आले आहे. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शुभेच्छा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes 2026 छत्रपति संभाजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा संदेश

LIVE: धर्मांतर आणि महिलांच्या छळाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन होणार

वर्षभर चांगला भाव मिळतो; शिमला मिरची लागवड प्रचंड नफा मिळवून देणारा व्यवसाय

प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कठोर कारवाईची घोषणा केली

पुढील लेख
Show comments