MNS आणि मराठी फिल्म उद्योग ने मुंबईवर वक्तव्य केल्याने कंगना झाली ट्रोल
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सतत टीका आणि वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आहे. दरम्यान मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगना रणौतविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडसह मराठी सेलिब्रेटींनीही कंगनाच्या या वक्तव्याचा विरोध केला आहे.
मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 4, 2020दुसरीकडे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये असं म्हटलं आहे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही अशी असंही ते म्हणाले आहेत.
मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे.
