Dharma Sangrah

महाराष्ट्राचे वैभव! आयुष्यात एकदा तरी पाहिलेच पाहिजेत असे ५ ऐतिहासिक किल्ले

Updated: मंगळवार, 5 मे 2026 (08:50 IST)
विशेष आकर्षण: गडावरील भव्य राजसदर, शिवरायांची समाधी, जगदीश्वर मंदिर, नगारखाना आणि उंच कडा असलेला 'टोकमाक टोक', कुशावर्त तलाव 
ALSO READ: ट्रेकिंगसाठी ओळखला जाणारा तुंग किल्ला
राजगड (स्वराज्याची पहिली राजधानी)
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात असलेला हा किल्ला शिवरायांच्या राजकीय हालचालींचे मुख्य केंद्र होता. महाराजांनी सर्वाधिक काळ  याच गडावर वास्तव्य केले. पुणे जिल्ह्यात असलेला हा किल्ला त्याच्या अवाढव्य विस्तारामुळे आणि कठीण बांधणीमुळे ओळखला जातो. हा किल्ला गिर्यारोहकांसाठी (Trekkers) पंढरी मानला जातो.
विशेष आकर्षण: पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची आणि बालेकिल्ला,  बालेकिल्ल्यावरून दिसणारा सभोवतालचा परिसर मंत्रमुग्ध करणारा असतो.
ALSO READ: छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला
प्रतापगड (जावळीचे खोरे)
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ असलेला हा किल्ला अफझलखानाच्या वधाच्या ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे. गडावरून सभोवतालचे जावळीचे घनदाट जंगल आणि निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ घालते.
विशेष आकर्षण: शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, भवानी माता मंदिर आणि अफझलखानाचा कोथळा बाहेर काढलेला तो ऐतिहासिक बुरूज,  
 
सिंधुदुर्ग (जलदुर्ग)
मालवणच्या समुद्रात शिवरायांनी बांधलेला हा एक अभेद्य जलदुर्ग आहे. समुद्रातील लाटांशी झुंज देत हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे.  समुद्रमार्गे होडीने किल्ल्यावर जाण्याचा अनुभव रोमांचक असतो.तसेच  समुद्राच्या मध्यभागी असूनही गडावरील विहिरींना 'गोड पाणी' लागते, हे स्थापत्यशास्त्राचे आश्चर्य आहे.
विशेष आकर्षण: किल्ल्याचे भक्कम प्रवेशद्वार, शिवरायांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशांचे मंदिर आणि गोड्या पाण्याचे विहिरी , गडाचे मुख्य प्रवेशद्वार जे शोधूनही लवकर सापडत नाही. 
 
पन्हाळगड (कोल्हापूरचा मानबिंदू)
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील महत्त्वाचा किल्ला आहे. 'पावनखिंडीचा लढा' आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान या गडाशी जोडलेले आहे. हा गड पर्यटनासाठी अतिशय सोयीचा असून निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.
विशेष आकर्षण: तीन दरवाजा, सज्जा कोठी, धान्य साठवण्याचा अंबरखाना आणि बाजीप्रभूंचा पुतळा.
 
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

करण जोहर 'ट्रेटर्स २' शोच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार

सुलतानपूर राष्ट्रीय पक्षी अभयारण्य: निसर्गप्रेमींनीआवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण

दिल्ली उच्च न्यायालयानकडून सलमान खानला मोठा दिलासा, 'काला हिरण' चित्रपटाचा टीझर हटवण्याचे आदेश दिले

पंकज त्रिपाठीच्या 'ओह माय डॉग' चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, चित्रपट आता या तारखेला प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी मुंबईत एक नवीन 'घर' विकत घेतले आहे, त्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल!

पुढील लेख
Show comments