संबंधित माहिती
- Saints of Maharashtra; महाराष्ट्रातील काही प्रमुख संत आणि त्यांची समाधीस्थळे; भेट दिल्याने मिळते अलौकिक समाधान
- Mahashivratri Special 'पुणेेश्वर' आणि 'नारायणेश्वर' प्राचीन महादेव मंदिर दर्शन
- Popular Indian tourist destinations काश्मीर ते गोवा पर्यंत भारतातील ही पर्यटन स्थळे आहे जगप्रसिद्ध
- Places to visit in Ratnagiri रत्नागिरीमध्ये भेट देण्यासाठी १० सर्वोत्तम ठिकाणे
- Famous Temples in Maharashtra महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नसून वास्तुकलेचा अद्भूत नमुना
विकेंड ट्रिपसाठी Hidden Gems महाराष्ट्रात
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लोणावळा, महाबळेश्वर आणि अलिबाग यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे नेहमीच पर्यटकांनी गजबजलेली असतात. जर तुम्हाला गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गरम्य अशा 'Hidden Gems' च्या शोधात असाल, तर या विकेंडला तुम्ही खालील ठिकाणांना भेट देऊ शकता. तसेच मुंबई- पुण्याच्या जवळपास (२-४ तास ड्राईव्ह) अशी काही छुपी रत्ने आहे जिथे गर्दी नाही, निसर्ग शांत आणि अनुभव अविस्मरणीय आहे.
जव्हार
महाराष्ट्रातील 'वॉटरफॉल्सचा शहर'! ९१ मीटर उंच दाभोसा धबधबा, हिरवीगार डोंगररांगा आणि आदिवासी संस्कृती. शांतता, फोटो आणि निसर्ग भटकंतीसाठी स्वर्ग.
अंतर: मुंबईहून ~१६० किमी (३-४ तास).
बेस्ट टाईम: जून-ऑक्टोबर.
विशेष: धबधबा ट्रेक, बोट राईड, गाव फिरा. रिसॉर्ट्स उपलब्ध.
ताम्हिणी घाट
मॉन्सूनमध्ये 'स्वप्नवत' ठिकाण! असंख्य छोटे-मोठे धबधबे, धुक्याने झाकलेला वळणदार घाट रस्ता आणि कोकण-सह्याद्रीचे मिश्रण. गर्दी टाळण्यासाठी आयडियल.
अंतर: पुण्याहून ~६०-७० किमी.
बेस्ट टाईम: जून-सप्टेंबर.
विशेष: कार ड्राईव्ह, वॉटरफॉल्स भेट, पिकनिक.
कोलाड
कुंडलिका नदीवर व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी बेस्ट हिडन स्पॉट! अॅडव्हेंचर + शांत निसर्ग. राफ्टिंगनंतर रिलॅक्स रिसॉर्ट्स.
अंतर: मुंबईहून ~१२० किमी.
बेस्ट टाईम: जून-ऑक्टोबर (राफ्टिंग सीझन).
विशेष: ३-५ किमी राफ्टिंग, कॅम्पिंग, नदीकाठ फोटो.
भंडारदरा
आर्थर लेक्स आणि रंधा फॉल्स (मॉन्सूनमध्ये भव्य!) साठी परफेक्ट. ट्रेकिंग, बोटिंग आणि शांत वातावरण.
अंतर: मुंबईहून ~१८० किमी.
बेस्ट टाईम: जून-ऑक्टोबर किंवा हिवाळा.
विशेष: लेक्स बोटिंग, फॉल्स भेट, हिल ट्रेक.
कलावंतीन दुर्ग
मुंबईजवळील सर्वात थ्रिलिंग ट्रेक पॉइंट! शिखरावरून ३६०° व्ह्यू, खडकाळ पायऱ्या आणि हिरव्या डोंगर. हिडन ट्रेकिंग जेम.
अंतर: पनवेल/मुंबईहून ~८० किमी (१-२ तास).
बेस्ट टाईम: ऑक्टोबर-मार्च (ट्रेकिंग).
विशेष : ३-४ तास ट्रेक, टॉपवर पिकनिक.
वेळस आणि आंजर्ले रत्नागिरी
अलिबागच्या गर्दीपेक्षा कोकणातील हे किनारे आजही शांत आहे.
विशेष : 'कासव महोत्सव' (Turtle Fest) साठी वेळस प्रसिद्ध आहे. आंजर्ले येथील 'कड्यावरचा गणपती' आणि तिथला पांढऱ्या वाळूचा किनारा मनाला शांतता देतो.
समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका आणि अस्सल कोकणी घरगुती जेवणाचा आस्वाद.
सांधण दरी अहमदनगर
याला 'The Valley of Shadows' असेही म्हणतात. ही आशियातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी दरी आहे.
विशेष : दोन उंच डोंगरांच्या मध्ये असलेली अरुंद दरी. इथे दिवसाही सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही. ट्रेकिंग, रॅपलिंग आणि कॅम्पिंग. (साहसी पर्यटकाकांसाठी सर्वोत्तम).
नांदगाव आणि कोर्लई रायगड
मुरुड-जंजिराकडे जाताना ही छोटी गावे लागतात.
विशेष : कोर्लई किल्ला आणि तिथला लाईट हाऊस (Deepgruh). इथून समुद्राचे दिसणारे ३६० डिग्री व्ह्यू अतिशय सुंदर असतात. नांदगावचा समुद्रकिनारा खूपच स्वच्छ आणि शांत आहे. फोटोग्राफी आणि किल्ला दर्शन उत्तम .
ट्रिप प्लॅन करताना काही टिप्स
होमस्टे: अशा ठिकाणी मोठ्या हॉटेल्सपेक्षा 'होमस्टे' निवडा, जेणेकरून तुम्हाला स्थानिक संस्कृती आणि अन्नाचा अनुभव घेता येईल.
गाडीची स्थिती: ही ठिकाणे थोडी दुर्गम असल्याने तुमच्या गाडीची कंडिशन तपासून घ्या.
नेटवर्क: काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या असू शकते, त्यामुळे ऑफलाईन मॅप्स डाऊनलोड करून ठेवा.
कसे जायचे: स्वतःची कार किंवा MSRTC बस.
