Maharashtra Drought | दुष्काळाच्या झळा!
WD |
पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमितीच्या बैठकीत आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दर पंधरा दिवसाला टँकरच्या संख्येत ३०० नी भर पडत असून जून पर्यंत टँकरची संख्या ७ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरच्या निविदा तालुका स्तरांवर काढण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दुष्काळामुळे प्रशासकीय खर्चातही वाढ झाली असून त्यासाठी अतिरिक्त निधी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पतंगराव कदम व पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पुढील दोन महिन्यांचा कालावधी कठीण असेल असे सुतोवाच केले.
- See more at: http://www.dainikekmat.com/detailnews?id=71042&cat=Mainpage#sthash.2WB0w7WJ.dpuf
