Dharma Sangrah

अश्‍विन, जडेजा, शमी यांना विश्रांती?

शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (09:54 IST)
कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांवर पडलेला ताण ध्यानात घेऊन, तसेच आगामी मोसमातील व्यस्त वेळापत्रकाच्या दृष्टीने श्रीलंकेविरुद्ध 20 ऑगस्ट रोजी सुरू होत असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघातील रविचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजा या फिरकीवीरांना विश्रांती देण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त आहे. तसेच दुखापतीतून परतलेला वेगवान गोलंदाज महंमद शमीलाही विश्रांती देण्यात येऊ शकते. त्यांच्या जागी यजुवेंद्र चाहल, अक्षर पटेल व कृणाल पांड्या या खेळाडूंचा समावेश करण्यात येऊ शकतो. झटपट क्रिकेटमधील स्पेशालिस्ट म्हणून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश निश्‍चित मानला जात आहे. वन डे मालिकेसाठी येत्या 13 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार असून कर्णधार विराट कोहली मात्र या मालिकेत खेळण्याबाबत आग्रही आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सुर्याभाऊची कॅप्टन्सी जाणार

विराट कोहली एकदिवसीय मालिकेतून बाहेर

सूर्यकुमार यादव मुंबई प्रीमियर लीगमध्येही पराभूत ,रहाणेचा संघ जिंकला

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का, टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडकडून दारुण पराभव

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू बनून हरमनप्रीत कौरने इतिहास रचला

पुढील लेख
Show comments