टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत सलग पराभवानंतर, भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय पुनरागमन केले आणि इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर चोख प्रत्युत्तर दिले. एडजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने यजमानांना ६ गडी राखून पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयामुळे भारतीय संघाने केवळ या दौऱ्यातील आपला पहिला विजयच नोंदवला नाही, तर एडजबॅस्टन येथील इंग्लंडचा प्रदीर्घ अपराजित विक्रमही संपुष्टात आणला. तसेच या विजयाचा नायक अक्षर पटेल होता, ज्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.Job completely done in style ✅#TeamIndia cruise to a 6️⃣-wicket victory to take a 1-0 lead in the ODI series ????
— BCCI (@BCCI) July 14, 2026
Scorecard ▶️ https://t.co/2sg194tpxH #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/PnUDkcVLyr