Dharma Sangrah

टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताची 2-0 अशी आघाडी

शनिवार, 23 डिसेंबर 2017 (11:11 IST)

इंदूरच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेवर 88 धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

रोहित शर्माच्या विक्रमी शतकाच्या जोरावर भारतानं श्रीलंकेसमोर 261 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाला 17.2 षटकांत सर्वबाद 172 धावांची मजल मारता आली. श्रीलंकेकडून उपुल थरंगा आणि कुशल परेरानं दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी रचत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यजुवेंद्र चहलनं थरंगाला बाद करत टीम इंडियाच्या मार्गातला मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर कुलदीप यादवनं कुशल परेरासह तीन फलंदाजांना माघारी धाडत भारताचा मालिका विजय साजरा केला. तर यजुवेंद्र चहलनं 52 धावांत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.

सुरुवातीला रोहित शर्मानं तुफानी फलंदाजी करताना 35 चेंडूत विक्रमी शतक झळकावलं.   टीम इंडियानं उभारलेली ही टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

शार्दुल ठाकूर मुंबईच्या टी२० लीगची धुरा सांभाळणार, संघाने त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली

IND W vs ENG W : दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय महिला संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल

रियान पराग ने वैभव सूर्यवंशीला फटकारले

GT vs RR : गुजरातने राजस्थानला सात गडी राखून हरवून तिसऱ्यांदा आयपीएल अंतिम फेरीत प्रवेश केला

दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच झिम्बाब्वेचा दौरा करणार

पुढील लेख
Show comments