Daily Horoscope

Father's Day वडिल म्हणजे एक विशाल वटवृक्ष

Updated: शुक्रवार, 19 जून 2020 (15:34 IST)
 
1972 चा दुष्काळ होता, सूर्य अक्षरशः आग आकत होता, पाण्यासाठी लोक कित्येक किलो मीटर अनवाणी जायचे. गावाचे सरपंचच काय गावाचे पाटील व गावातील प्रतिष्ठीत लोक रोजगार हमीच्या दररोज मारामार असायची... उपाशी तपशी दिवस व रात्र काढणे तर नित्याचेच होत. मी तेव्हां 6/7 वर्षाचा असेल, घरात खाणारी आम्ही सहा भावंडे व आई वडील... शिळ्या तुकड्या वरून ही आम्हा भावंडात ओढा ओढी होत असे... ते शिळे तुकडे ही शिल्लक नव्हते ...आई ने सांगितले, वडिलांना बघ म्हणून... मी अनवाणीच दगड काटे तुडवीत मी दूर माळ रानावर वडिलांना एका दगडावर बसलेले पहिले...आजू बाजूला दूर दूर पर्यंत कुणीच नव्हते ...जवळ जाऊन पाहतो तर आमचे आण्णा जोर जोरात ओक्साबोक्षी रडत होते ....अगदी हंबरडा फोडूनच... मी हि त्यांच्या सुरात सूर मिळवला... पण कळले काहीच नाहीं... तो प्रसंग अजूनही मनात घर करून राहिलेला आहे...
...तर सांगायचा मुद्दा हा होता कि पुरूष हृदय हे विशाल वट (वड) वृक्षा सारखे असते...वरून सर्व आलबेल दिसत असते ....सर्वाची काळजी घेत असते... सर्वांची किलबिल ह्यांच्या हृदयाला फुटलेल्या फांद्यावर, पानावर, फुलावर, फळावर सुरू असते ...आणि हे असते तटस्थ, कुठल्याही भावना मनातल्या मनात जिरवून...
 
... अन एक दिवस.... काही कळायच्या आत धाडदिशी उन्मळून पडतात... कोसळतात... नंतर आपल्याला कळते...अरे आपण पोरके जालोय ...आपले आकाशच हरवले आहे ... आपल्या पंखाना जरी बळ आलेले असले, ...तरी, पाय स्थिर पणे ठेवावेत असा आधारच राहिला नाहीं... आमचाही आधार पणे ठेवावेत असा आधारच राहिला नाहीं... आमचाही आधार असाच 8 वर्ष पूर्वी निघून गेला....असो.
 
-अमर बाळासाहेब कुसाळकर

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

National Engineers Day 2026: राष्ट्रीय अभियंता दिन, इतिहास आणि महत्त्व

"ही माझी शेवटची भेट असू शकते": मुंबई मोर्चापूर्वी मनोज जरांगे भावूक; ते आपल्या आवाहनात म्हणाले...

चहापासून ते किराणा मालापर्यंत... आता 2,000 पर्यंतचे UPI पेमेंट विनाशुल्क होणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

सरकार महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी संहिता (UCC) आणण्याच्या तयारीत!

LIVE: हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी पावसाचा इशारा जारी केला

पुढील लेख
Show comments