गुरूवार, 28 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (16:24 IST)
संबंधित माहिती
कशासाठी पोटासाठी
शतकानंतर आज पाहिली
लेझिम चाले जोरात
सदैव सैनिका...
देवाचे घर
कशासाठी पोटासाठी
कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी
चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक् शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी
उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी
डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !
कवी- माधव ज्यूलियन
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?
नंदादीप वात :- किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी -- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते...ही रोज पूजेच्या वेळेस लावतात... बेलवात :- या श्रावण महिनाभर लावतात -- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4 4 3 पदरी) टोटल 11 पदर...या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात...
मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या
१. सावली दिसेनाशी होणे: गरुड पुराणात सांगितल्यानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंतकाळ अत्यंत जवळ येतो, तेव्हा त्याला पाण्यात, तेलात किंवा आरशात स्वतःचे प्रतिबिंब अस्पष्ट दिसू लागते किंवा पूर्णपणे नाहीसे होते.
अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?
हिंदू धर्मात अधिक मास हा अतिशय पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात स्त्रिया अनेक धार्मिक विधी, व्रत आणि परंपरा पाळतात. त्यापैकी एक म्हणजे नवीन जोडवी (पायातील चांदीची बोटात घालायची अंगठी) घेणे किंवा परिधान करणे.
अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं
शुभ आणि मांगलिक कार्ये करणे टाळावे अधिक मासाला 'मलमास' असेही म्हणतात. या काळात ग्रहांची स्थिती शुभ कार्यांसाठी अनुकूल नसते. त्यामुळे खालील मांगलिक कार्ये या महिन्यात करू नयेत: विवाह (लग्न): या महिन्यात लग्न ठरवणे किंवा करणे अशुभ मानले जाते. मुंज (उपनयन संस्कार): मुलांचा मुंज संस्कार या काळात केला जात नाही. गृहप्रवेश: नवीन घरात प्रवेश करणे किंवा वास्तुशांती करणे टाळावे. नवीन व्यवसाय सुरू करणे: नवीन दुकान, व्यवसाय किंवा भागीदारीची सुरुवात या महिन्यात करू नये.
सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा
आजकाल ऑनलाइन राहणे ही एक सवय झाली आहे, परंतु स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्याने नात्यांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होऊ शकतो. कधीकधी, आपण मोबाईलच्या जगात किती हरवून गेलो आहोत आणि आपल्या प्रियजनांपासून दूर जात आहोत, हे आपल्या स्वतःच्याही लक्षात येत नाही. तसेच जागे झाल्यावर लगेच नोटिफिकेशन्स तपासणे, दिवसभर सोशल मीडियावर सक्रिय राहणे आणि झोपायच्या वेळेपर्यंत मित्रांसोबत रील्स शेअर करणे ही एक सवय झाली आहे. कधीकधी, दिवसभर ऑनलाइन राहण्याच्या तुमच्या सवयीचा तुमच्या नात्यांवर, मैत्रीवर आणि अगदी प्रेमावरही विनाशकारी परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, डिजिटल जीवन आणि नाती यांच्यात योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे ठरते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Lunch Box recipes लंच बॉक्स मध्ये नेण्यासाठी काही झटपट रेसिपी
सकाळच्या घाईगडबडीत डब्यासाठी काय बनवायचे, हा एक मोठा प्रश्न असतो. अशा वेळी चविष्ट, पौष्टिक आणि १० ते १५ मिनिटांत तयार होणाऱ्या रेसिपीज खूप मदतीला येतात. याकरिता आज लंच बॉक्ससाठी झटपट तयार होणाऱ्या ४ सोप्या आणि टेस्टी रेसिपीज आपण पाहणार आहोत.
रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा
रिलायन्स ग्रुपने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १,००,००० हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत रिलायन्सच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या वाढून ४,१९,९११ झाली आहे. या कालावधीत, कंपनीने एआय, डेटा सायन्स, ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यांसारख्या क्षेत्रांमध्ये नवीन प्रतिभा जोडण्यावर लक्ष केंद्रित केले. रिलायन्सच्या मते, ही भरती कंपनीच्या परिवर्तनाचे प्रतीक आहे, ज्यामुळे कंपनी स्वतःला एक 'एआय-फर्स्ट' आणि 'डीप-टेक' कंपनी म्हणून स्थापित करत आहे.
World Digestive Health Day 2026 जागतिक पचन आरोग्य दिन संकल्पना आणि महत्त्व, योग्य माहिती जाणून घ्या
या वर्षी, म्हणजेच २०२६ ची जागतिक पचन आरोग्य दिनाची मुख्य संकल्पना आहे: "क्रॉनिक डायरिया: डोन्ट फ्लश द साइन्स अवे" (Chronic Diarrhea: Don't Flush the Signs Away) अर्थात 'तीव्र/दीर्घकालीन अतिसार: लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.'
किचनमधील दुर्गंधी आणि झुरळांपासून सुटका हवीय? हे ४ सोपे हॅक्स नक्की ट्राय करा
किचनमध्ये काम करताना जर तिथे दुर्गंधी येत असेल किंवा झुरळांचा वावर असेल, तर मूड तर खराब होतोच, शिवाय आरोग्यालाही धोका निर्माण होतो. रासायनिक कीटकनाशके वापरण्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील साहित्याचा वापर करून या समस्येपासून सुटका मिळवू शकता. किचन स्वच्छ आणि सुगंधी ठेवण्यासाठी हे ४ सोपे आणि प्रभावी हॅक्स नक्की ट्राय करा.
प्रख्यात कवी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते बशीर बद्र यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन
उर्दू कवितेच्या विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रख्यात कवी बशीर बद्र यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि गझल विश्वात शोककळा पसरली आहे. बशीर बद्र हे आधुनिक उर्दू गझलचे सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय कवी मानले जात असत; त्यांची कविता थेट सर्वसामान्य लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचत असे.