साखरपुडा झाल्यानंतर नवरा-बायकोमधील दूरध्वनीवरील संवाद  
					
										
                                       
                  
                  				  साखरपुडा झाल्यानंतर (लग्नापूर्वी ) नवरा-बायकोमधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता....! 
				  													
						
																							
									  
	 
	नवरा - याच दिवसाची मी कधीपासून वाट पाहत होतो.
	 
	बायको - तू मला सोडून जाशील ? 
				  				  
	 
	नवरा - स्वप्नातसुध्दा असा विचार कधी करणार नाही. 
	 
	बायको - तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ?
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	नवरा - होय. आजच नाही तर सातजन्मासाठी.
	 
	बायको - तू मला विसरून जाशील ? 
	 
				  																								
											
									  
	नवरा - त्यापेक्षा मी मरण पसंत करेन.
	 
	बायको - तू मला खरेदीला नेशील ? 
	 
	नवरा -  नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही.
				  																	
									  
	 
	बायको - तू मला मारपीट करशील ? 
	 
	नवरा - तशी घोडचूक मी कधीच करणार नाही. 
	 
				  																	
									  
	बायको - तू मला शेवटपर्यत साथ देशील ?
	 
	आणि (लग्नानंतर ) त्या दोघांचं  संभाषण कसं होतं ते परत एकदा खालून वर वाचत जा...