बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: रविवार, 13 जून 2021 (10:02 IST)

मन वढाय वढाय,

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
 किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । 
जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । 
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
 
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे ।
 इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। 
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
 
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । 
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । 
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
 
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । 
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । 
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥
 
कवयित्री – बहिणाबाई चौधरी