1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र

पाक लागला युद्ध तयारीला

मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हाल्ल्यांनंतर भारत आणि पाक या उभय देशांच्या संबंधांमध्ये आता मिठाचा खडा पडला असून, या धास्तीने पाकने अफगाण सीमेवर तैनात केलेले आपले सैन्य भारतीय सीमेवर हालवण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत.

हे सैन्य म्हणजे तालिबानी लडाकू असल्याचे मत भारतीय सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केले असून, भारत सरकारने वेळीच यावर निर्णय न घेतल्यास भारतीय सीमा कायमच्या अशांत होण्याची भीती या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत झालेल्या स्फोटांमध्ये पाकचा हात असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर भारत सरकारने उघड उघड पाकविरोधात नाराजी व्यक्त केल्याने पाक सरकारने धास्तीने हा निर्णय घेतला असून, पाकसरकारमध्ये बेचैनी असल्याचे म्हटले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा