संबंधित माहिती
- कोरोना : सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला सवाल, आतापर्यंत किती लस खरेदी केली?
- कंत्राटदाराला जाब विचारण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ बीकेसी कोविड सेंटरमध्ये
- याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय: भातखळकर
- संभाजीराजे छत्रपतींवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - दिलीप वळसे पाटील
- नवी मुंबईत भाजपाला धक्का; मोठ्या नेत्याचा मनसेत प्रवेश
मनसेचा सवाल, तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का?
राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. ५ टप्प्यांमध्ये राज्यात अनलॉक केलं जाणार आहे. या पाच टप्प्यांमध्ये मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. यावरून मनसेने सवाल उपस्थित केला आहे. तसंच शिवसेना आणि सरकारवर निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “मुंबई मॉडेलचं कौतुक करणारे तोंडावर आपटले आहेत. जर मुंबई मॉडेल यशस्वी होते तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का?” असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.
