देशातील 150 अशा जागा आहेत, जिथे भाजपचा पराभव झाला होता. तिथे विजयासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत, असं अमित शाह यांनी बैठकीत सांगितलं. या जागा निवडून आणण्यासाठी त्यावर पुढील दोन वर्षे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजनांविषयी मंत्र्यांकडून माहिती मागवली. अमित शाह यांनी बैठकीला उपस्थित असणाऱ्या 9 केंद्रीय मंत्री आणि 30 पक्ष पदाधिकाऱ्यांना आतापासूनच कामाला लागण्यास सांगितले आहे. यावेळी अमित शाह यांनी 10 मिनिटांचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही सादर केलं. यामध्ये बंगाल, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांचा विशेष उल्लेख केला गेला आहे.