suvichar

बीएसएफकडून पाक रेंजर्सला मिठाई नाही

सोमवार, 31 ऑक्टोबर 2016 (09:07 IST)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव असल्याने यंदा अत्तारी-वाघा सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सला मिठाई देण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे, सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) स्पष्ट केले. त्यामुळे दरवर्षी देण्यात येणारी मिठाई यावर्षी देण्यात येणार नसल्याचे बीएसएफने स्पष्ट केले.
 
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे तीव्र पडसाद वाघा सीमेवरही पाहायला मिळाले असून दरवर्षी बीएसएफच्या जवानांकडून पाकिस्तानी रेंजर्सला मिठाई देण्यात येते. काश्‍मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधी उल्लंघन सातत्याने होत असून यामध्ये भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. शुक्रवारी पाकिस्तानी सैन्याने माछिल सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात बीएसएफचे २ जवान हुतात्मा झाले होते.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments