Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोरखपुरमध्ये ऑक्सीजन पुरवठा ठप्प झाल्याने 30 मुलांचा मृत्यू

Updated: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (09:47 IST)
 
गोरखपूरचे जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मुले एनएनयू वॉर्डमध्ये दाखल होती, तर 17 मुले मेंदूज्वर वॉर्डमध्ये दाखल होती. मागील 48 तासांत 30 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बाबा राघव दास रूग्णालयात अनेक गरीव रूग्णांवर उपचार केले जातात. मेंदूज्वर विभागातही लहान मुलांवर उपचार सुरू असतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या रूग्णालयात ऑक्‍सिजनची कमतरता भासत होती. या रूग्णालयाचे 69 लाखांचे ऑक्‍सिजनचे बिल थकल्यामुळे पुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच सिलिंडरही संपले होते. त्यामुळे मागील 48 तासांमध्ये लहान मुलांना आपला जीव गमावावा लागला आहे.
 
रौतेला म्हणाले, मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्‍सीजनची उपलब्धता करून देण्यासाठी संत कबीर नगर जिल्ह्यातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ऑक्‍सीजन पुरवठा करणाऱ्या कंपनीलाही आंशिक भुगतान देण्यात आले होते. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली असून उद्या संध्याकाळपर्यंत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. या मृत्यूप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही रौतेला यांनी सांतिगले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments