Marathi Biodata Maker

आठ बँक कर्मचार्‍यांचा सडक अपघातात मृत्यू

गुरूवार, 10 नोव्हेंबर 2016 (12:44 IST)
कानपूर- 500 आणि 1000 रुपय्यांच्या नोटा बदलण्यात आम जनतेला त्रास नको म्हणून रात्री उशिरा बँकेत काम करून परत येत असलेल्या एसबीआयच्या ब्रांच मॅनेजरसह 8 कर्मचार्‍यांचा बिधून येथे सडक अपघातात मृत्यू झाली. ते सर्व एक व्हॅनमध्ये बरोबर प्रवास करत होते तेव्हा बिधूनमध्ये बुधवारी रात्री कंटेनर- व्हॅनची टक्कर झाला. टक्कर इतकी भयावह होती की पोलिसांनी शव काढायला दोन तास लागले.
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की व्हॅन योग्य दिशेने येत होते परंतू कंटेनर अनियंत्रित झाल्यामुळे टक्कर झाली. व्हॅन दलादलामध्ये कोसळली आणि कंटेनर त्यावर पडला. ज्यामुळे व्हॅनमध्ये प्रवास करते असलेले घटनास्थळीच मृत्युमुखी पडले. वीस मिनिटांनंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी अॅम्बुलेंसही बोलवली परंतू तेव्हापर्यंत आठी लोकं जीव गमावून बसले होते.
 
घटनेनंतर कंटेनर चालक तिथून फरार झाला असून पोलिसांनी कंटेनर जप्त केले. ही बातमी कळल्यावर बँकेच्या इतर कर्मचार्‍यांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले तसेच मृतकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments