शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (11:38 IST)

बिहारमधल्या नव्या समीकरणांचं असं आहे 'महाराष्ट्र कनेक्शन'

नामदेव काटकर
मंगळवारचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकीय घडामोडींनी गाजला. या दोन्ही घडामोडींमध्ये केंद्रस्थानी होती भाजप.
 
आणखी विशेष गोष्ट म्हणजे, बिहारमधील घडामोडींचं थेट नसलं, तरी महाराष्ट्र कनेक्शन आहे. आणि तेच आम्ही तुम्हाला या वृत्तलेखातून सांगणार आहोत.
 
तत्पूर्वी, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये मंगळवारी (9 ऑगस्ट) नेमकं काय घडलं, यावर एक अगदी धावती नजर टाकूया. जेणेकरून पुढे आपल्याला 'महाराष्ट्र कनेक्शन' समजून घेण्यास अधिक सोपं जाईल.
 
सरकार विस्तारलं, सरकार पडलं!
एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.
 
या गोष्टीला महिना लोटला होता, तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत होती. मात्र, मंगळवारी म्हणजे 9 ऑगस्टला अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला.
 
महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारानं भाजपमध्ये आनंदाची लाट पसरली असतानाच, बिहारमध्ये भाजपला धक्का बसला. तो धक्का दिला, नितीश कुमार यांनी.
 
बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल सर्वांत मोठा पक्ष असतानाही नितीश कुमारांनी भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. बिहारमध्ये भाजपसाठी लॉटरी लागली होती. कारण ते निवडणुकीत तिसऱ्या स्थापनी फेकले गेले होते. तरीही सत्तेत बसले.
 
मात्र, नितीश कुमार यांनी दोन वर्षांनी म्हणजे मंगळवारी (9 ऑगस्ट) भाजपला बाजूला करत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेतलं.
 
1967 च्या निवडणुकीत आचार्य अत्रे पराभूत झाले होते. मात्र, त्याचवेळी त्यांचे सहकारी जॉर्ज फर्नांडीस जिंकले होते. त्यामुळे निकालाच्या दुसऱ्या दिवशी आचार्य अत्रेंनी 'मराठा'मध्ये अग्रलेख लिहिला होता. त्याचा मथळा होता - 'आम्ही जिंकलो, आम्ही हरलो'
 
भाजपसाठी मंगळवारचा दिवस तसाच ठरला. अत्रेंच्या शब्दात थोडे बदल करून सांगता येईल - 'सरकार विस्तारलं, सरकार पडलं'.
 
बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल सर्वांत मोठा पक्ष असतानाही नितीश कुमारांनी भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. बिहारमध्ये भाजपसाठी लॉटरी लागली होती. कारण ते निवडणुकीत तिसऱ्या स्थापनी फेकले गेले होते. तरीही सत्तेत बसले.
 
मात्र, नितीश कुमार यांनी दोन वर्षांनी म्हणजे मंगळवारी (9 ऑगस्ट) भाजपला बाजूला करत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेतलं.
 
1967 च्या निवडणुकीत आचार्य अत्रे पराभूत झाले होते. मात्र, त्याचवेळी त्यांचे सहकारी जॉर्ज फर्नांडीस जिंकले होते. त्यामुळे निकालाच्या दुसऱ्या दिवशी आचार्य अत्रेंनी 'मराठा'मध्ये अग्रलेख लिहिला होता. त्याचा मथळा होता - 'आम्ही जिंकलो, आम्ही हरलो'
 
भाजपसाठी मंगळवारचा दिवस तसाच ठरला. अत्रेंच्या शब्दात थोडे बदल करून सांगता येईल - 'सरकार विस्तारलं, सरकार पडलं'.