1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Maharashtra Farmer Loan Waiver Scheme

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना ३० जूनपूर्वी लागू केली जाईल; कृषी मंत्र्यांचे मोठे विधान

Datta Bharane
शेतकरी कर्जमाफी योजना ३० जूनपूर्वी लागू केली जाईल. आचारसंहिता लागू असूनही शेतकऱ्यांना दिलासा देण्याची प्रक्रिया थांबणार नाही, असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
 
शेतकऱ्यांसाठी मोठ्या दिलासाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना ३० जूनपूर्वी लागू केली जाईल.
विधान परिषद निवडणुकांची घोषणा आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही योजना रखडेल अशी भीती होती, परंतु कृषी मंत्री दत्ता भराणे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
 
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले असून, ही प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. याच काळात कर्जमाफीच्या अंमलबजावणीची चर्चा सुरू झाली होती, ज्यामुळे आचारसंहितेचा या योजनेवर परिणाम होईल का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
 
कृषी मंत्री दत्ता भारणे यांनी सांगितले की, आचारसंहिता असूनही शेतकरी कर्जमाफी योजनेत कोणताही अडथळा येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सकारात्मक आणि योग्य निर्णय घेतील.  
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा