1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2024 (11:36 IST)

मांजर चावल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

नागपुरातील हिंगणा तालुक्यात उखडी गावात11 वर्षीय मुलाला मांजरीने चावा घेतल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रेयांशु कृष्णा पेंदाम असं या मयत मुलाचे नाव हे. श्रेयांशु हा घरा जवळ खेळत असताना खेळता-खेळता मांजरीने त्याच्या पायाला चावा घेतला.त्याने घरी आल्यावर आपल्या आईला हा प्रकार सांगितला. काहीच वेळा नंतर त्याला उलट्या सुरु झाल्या .त्याच्या घरच्यांना आणि शेजारच्या लोकांना ही बाब समजल्यावर त्यांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं तिथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं.  

नेमके कारण जाणून घेण्यासाठी त्याचे मृतदेह शव विच्छेदन साठी पाठविण्यात आले.शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल,पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे आताच सांगणे कठीण आहे.मांजरीने चावा घेतल्याने मृत्यू होण्याची ही दुर्मीळ घटना आहे.पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit