Marathi Biodata Maker

अकरावीसाठी आता फक्त 15 गुण ग्रेस

पुणे- राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावी उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये बदल केला आहे. एखादा विद्यार्थी तीन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला यापूर्वी 30 गुण ग्रेस दिले जात होते. त्याला आता केवळ 15 गुण ग्रेस मिळतील. यामुळे अकरावीत नापासाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
अकरावीचा अभ्यासक्रम पुनर्रचित केल्याने हा बदल करण्यात आला आहे. बारावीप्रमाणे अकरावीसाठी हा नियम लागू राहील. तो केवळ तीन विषयांसाठी मर्यादित असेल. एकाच विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल, तर त्याला कमाल दहाच गुण ग्रेस म्हणून दिले जातील. अकरावी आणि बारावी परीक्षेतील उत्तीर्ण होण्याच्या निकषातील तफावत यामुळे दूर होणार आहे, असे मंडळाने स्पष्ट केले.
 
अकरावीत तीन विषयांत व दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 30 गुण विभागून दिले जात होते. म्हणजे त्याला तीन विषयांत प्रत्येकी दहा गुण मिळत होते. आता तेवढे गुण मिळणार नाहीत.
 
विद्यार्थी तीन व दोन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला बारावीप्रमाणे 15 गुण विभागून दिले जातील. निकषात बदल करण्याचा प्रस्ताव मंडळाने राज्य शासनाकडे पाठविला होता.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

पुण्यात 'कॉकरोच जनता पार्टी'चे आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी खुला अल्टिमेटम

पुण्यात 'कॉकरोच जनता पार्टी'चे आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी खुला अल्टिमेटम

लातूरमध्ये साडेसात एकर जमीन मिळताच ८९ वर्षीय आजीला सोडले बेवारस; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, नातवाचे 'गिफ्ट डीड' रद्द

मन हेलावून टाकणारी घटना; कुत्र्याच्या तोंडात नवजात अर्भक सापडल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

पवार-ममता पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर? रोहित पवारांच्या या एका विधानाने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ

पुढील लेख
Show comments