Marathi Biodata Maker

पत्नीचे मंगळसुत्र लांबवले व पतीला मारहाण केली

Updated: रविवार, 16 एप्रिल 2017 (11:41 IST)
 
याबाबतचे वृत्त असे की, उत्तम खंडेराव गायकवाड, रा. काठे गल्ली, द्वारका, नाशिक हे पत्नीसह कार नंबर एमएच ०२ बीजे ३८५९ मधून सिन्नरहून नाशिककडे येत होते. शिंदे पळसे गावाजवळ असलेल्या हॉटेल विसावा ते किरण ढाबा या दरम्यान त्यांची कार अशोक तायडे उर्फ वाकचौरे या व्यक्तीने थांबवली.
 
त्यानंतर गायकवाड यांच्याशी वाद घातला. ही घटना घडत असताना पत्नीने हस्तक्षेप केला असता तायडे याने गायकवाड यांना मारहाण करून जखमी केले व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून पसार झाला. या घटनेनंतर गायकवाड यांनी नाशिकरोड पोलीसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास वपोनि पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
 
वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळ रस्ता ओलांडत असताना ७४ वर्षीय वृद्धाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर वृद्ध ठार झाला असून या प्रकरणी नाशिकरोड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मुरलीधर सावळीराम शिंदे हे शिंदे गाव येथे रस्ता ओलांडत असताना नाशिकहून सिन्नरकडे भरधाव वेगाने येणार्‍या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे या अपघातात शिंदे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी मोहन मुरलीधर शिंदे (चेहेडी) यांनी नाशिकरोड पोलीसांत अज्ञात वाहनचालकाविरूद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सपोनि शेवाळे हे करीत आहेत.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

LIVE: आषाढी एकादशीच्या दिवशी मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

आता तुम्ही मोबाईल नेटवर्कप्रमाणे तुमची वीज कंपनी निवडू शकता; सरकारने एक नवीन योजना तयार केली

भारतातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा, डब्यांमधील सुरक्षा व्यवस्थाही कडक केली जाणार

नीट पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाने एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments