suvichar

आरक्षणाला विरोध करणारे धनगर समाजाला काय आरक्षण देणार - धनंजय मुंडे

Updated: सोमवार, 4 जून 2018 (17:13 IST)

ज्यांच्या इशाऱ्यावरून राज्य आणि केंद्रातील भाजपा सरकार चालते त्या नागपूरच्या संघ कार्यालयातून प्रत्येक १५ दिवसाला देशातील आरक्षणे संपवण्याची भाषा केली जाते. जे आरक्षण संपवण्याची भाषा करतात ते धनगर समाजाला काय आरक्षण देणार, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे  यांनी केला आहे.
 

परभणीच्या खंडोबा बाजार मैदान परिसरात अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारने धनगर समाजाची चार वर्षांपासून फसवणूक केली आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याची घोषणा करणा-यांना २०० बैठका होऊनही आरक्षण का देता आले नाही असा सवाल उपस्थित करतानाच आरक्षणाच्या या लढाईत मी धनगर समाजाच्या खांद्याला खांदा लावून सर्वात पुढे असेल अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली. सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची सरकारची घोषणाही फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य केवळ एका समाजापुरते मर्यादित नाही तर त्यांनी समस्त मानवजातीसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम केवळ एका समाजाने न करता सर्व समाजाने एकत्र येऊन करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार  बाबाजी दुर्रानी , आमदार राहुल पाटील, आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, आमदार विजय भांबळे, माजी खासदार सुरेश जाधव, विठ्ठलराव रबदाडे, प्रा. शिवाजी दळणकर, डॉ. विवेक नावंदर, दिनेश परसावत, संयोजक मारोतराव बनसोडे मामा आदी उपस्थित होते.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली

LIVE: मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली

मुंबईतील चेंबूरमध्ये सहा मांजरे ठार केल्याप्रकरणी आरोपीला अटक

इंडोनेशियामध्ये 240 लोकांना घेऊन जाणारे जहाज उलटले, 130 प्रवासी बेपत्ता आणि सहा जणांचा मृत्यू

गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊसाची हजेरी

पुढील लेख
Show comments