संबंधित माहिती
- ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत आवश्यकता आहे : अजित पवार
- अडीच वर्षे सरकारनं सूड उगवला, आता जनता मोकळा श्वास घेतेय - फडणवीस
- एसटी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये
- सामनामध्ये प्रसिध्द होणा-या उध्दव ठाकरे यांच्या मुलाखतीचा ट्रिझर रिलीज
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जूलैला नाशिक दौ-यावर; माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये : शिवसेना
खरी शिवसेना कोणाची या दाव्यासंदर्भात निवडणूक आयोगाद्वारे सुरू असलेल्या प्रक्रियेविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेत. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली. जोपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणीही त्यांनी याचिकेतून केली आहे.
या याचिकेत उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटाच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने जी कारवाई सुरू केलीय, तिला स्थगिती देण्याची मागणी केली. या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर कारवाई करू शकत नाही, असा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्याकडून याचिकेत करण्यात आला आहे.
