Daily Horoscope

हिमालयातल्या हिमनद्या वेगानं वितळताहेत, लाखो लोकांवर होणार परिणाम?

Updated: शनिवार, 29 जून 2019 (10:28 IST)
 
2011मध्ये हा अभ्यास सार्वजनिक करण्यात आला आणि US Geological Surveyनं शास्त्रज्ञांच्या वापरासाठी या माहितीचं डिजिटलायजेशन केलं.
 
या कार्यक्रमांतर्गत हिमालयाचे काही फोटो काढण्यात आले, त्यातून हिमालयाबद्दलची बरीच दुर्मीळ माहिती समोर आली.
 
या फोटोंची आताच्या NASA आणि Japanese space agency (Jaxa)च्या फोटोंशी तुलना केल्यास हा भाग कसा बदलला आहे, हे लक्षात येतं.
 
कोलंबिया विद्यापीठाच्या टीमनं 2 हजार किलोमीटर परिसरातल्या 650 हिमनद्यांची पाहणी केली.
 
यादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की, 1975 ते 2000 या 25 वर्षांत दरवर्षी सरासरी 4 अब्ज टन बर्फ हिमालयानं गमावला आहे. पण 2000 ते 2016 या काळात हिमालायाने 8 अब्ज टन बर्फ गमावला आहे.
 
तसंच बर्फ वितळण्याचं प्रमाण एकसारखं नाहीये.
 
"हिमनद्यांचं खालच्या भागातील बर्फ वितळण्याचं प्रमाण अधिक आहे. यांतील काही भाग दरवर्षी सरासरी 5 मीटरनं वितळत आहे," ते पुढे सांगतात.
 
वैज्ञानिक समुदायात या विषयावर काही वादविवाद आहेत. या क्षेत्रातील पर्जन्यवृष्टीतील बदल आणि औद्योगिक प्रदूषणामुळे बर्फ वितळत आहे, असं म्हटलं जात आहे.
 
हे घटक कारणीभूत आहेच, पण याहीपेक्षा हिमालयातील वाढतं तापमान यासाठी सर्वाधिक कारणीभूत आहे, असं कोलंबिया टीमनं म्हटलं आहे.
 
"बर्फ वितळण्याचं प्रमाण बहुतेक ग्लेशियरमध्ये सारखचं आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर आहे. ही गोष्ट सूचित करते, सगळ्याच हिमनद्यांना प्रभावित करणारं कोणतं तरी बल कार्यान्वयित आहे," ते पुढे सांगतात.
 
बर्फ नियमितपणे वितळत राहिल्यास त्याचा मोठा परिणाम होईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
 
अल्पकालीन परिणाम म्हणजे, बर्फ वितळण्याचं प्रमाण अधिक वाढल्यास पूर येऊ शकतो.
 
दीर्घकालीन परिणाम म्हणजे दुष्काळाच्या काळात हिमनद्यांच्या वितळलेल्या पाण्यावर अवलंबून असलेले लाखो लोकांचं आयुष्य खडतर होऊ शकतं.
 
या अभ्यासाविषयी British Antarctic Surveyचे डॉ. हेमिश प्रिचर्ड सांगतात, "हवामानातील बदलामुळे संपूर्ण हिमालयाच्या पर्वतरांगेतील हिमनद्या वितळण्याची प्रक्रिया कशी वाढली आहे, हे या अभ्यासातून समोर येतं. खूप काळापासून बर्फ वितळण्याचं प्रमाण दुप्पट झालं आहे आणि त्यामुळे हिमनद्या बारीक होत आहेत."
 
जेव्हा बर्फ संपेल तेव्हा आशियातल्या काही नद्यांचं पाणी कमी होईल. हिमनद्यांशिवाय दुष्काळाची दाहकता आणखी वाढेल. लाखो लोकांच्या आयुष्यावर यामुळे परिणाम होईल.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments