यावेळी बोलताना आ.अमरसिंह पंडित म्हणाले की कृषीमूल्य आयोग केवळ नावाला ठेवू नका. पाशा पटेल यांच्या कृषीविषयक सल्ल्यांचे अनुकरण करण्याची गरज आहे. एक्सपोर्ट आणि इम्पोर्टची पॉलिसी राज्यात उत्पादित होणाऱ्या पिकांच्या आणि फळांच्या प्रमाणावर ठरवली गेली पाहिजे असेही त्यांनी सभागृहात सांगितले.
कर्जमाफीबाबत बोलताना आ. पंडित म्हणाले की सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. शासनाने कर्जमाफीची आकडेवारी स्वतः तपासून घेतली पाहिजे. ही कर्जमाफी शेतकऱ्यांची एेतिहासिक फसवणूक करणारी आहे.