suvichar

घोषणा ७/१२ ची, तयारी शेतकऱ्यांच्या ३/१३ची

बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (17:14 IST)

सरकारची भाषा शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याची मात्र प्रत्यक्षात तयारी शेतकऱ्यांचे ३/१३ वाजवण्याची आहे. १ सप्टेंबर ही कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अखेरची तारीख. एक महिना असेसमेंट करून मग सरकार १ ऑक्टोबरपासून निधीचे वाटप सुरू करणार अशी राज्य सरकारची घोषणा आहे. पण या ऑनलाइन प्रक्रियेत कालचा गोंधळ बरा होता असं म्हणावं लागतंय. आधीच पिकविम्याच्या वेळी सरकारची वेबसाइटच क्रॅश होऊन भुईसपाट झाली. मुंबई युनिव्हर्सिटीच्या ऑनलाइन पेपर तपासणीचा तर बोजवाराच उडाला. प्राध्यापकांना ऑनलाइन गोष्ट जमेना तिथे सरकारची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरावा? अशी टीका आणि मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

वेबसाइटची गडबड एवढी आहे की अडचणी आणखी वाढतायत. सहा पानी फॉर्म पाहून भांबावलेला भाबडा शेतकरी १०,००० रू. ची मदत मिळवण्यासाठी पदरचे पैसे खर्च करत एपीएमसीचे उंबरे झिजवत आहे. अर्ज कसा करायचा याबाबत त्याला मार्गदर्शन करणारं कुणी नाही. एकमेकांना विचारत कसाबसा तो समजण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही ठिकाणी माणूसकीचे शत्रू शेतकऱ्यांकडूनच पैसे काढू पाहत आहे. आधीच कर्जबुडव्यांमुळे बेजार झालेल्या राष्ट्रीय व सहकारी बँकाही पिकविमा आणि कर्जमाफीसंदर्भात शेतकऱ्याला दारात उभं करत नाहीत. गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढच झालेली आहे. घोषणा करून दोन महिने उलटले. आणखी महिन्याभराने सगळं सुरळीत होईल याची गॅरंटी नाही. राज्यातील शेतकऱ्याचे सातबारा कोरे करण्याचं राहिलं बाजूला, इथे सरकारकडून शेतकऱ्यांचे तीन-तेरा वाजवण्याचे उद्योग सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी दिली.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

बाबा, मी ठीक आहे," असं म्हणत नवविवाहिताची गळफास घेऊन आत्महत्या बीडची घटना

मराठा आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना फडणवीस सरकार प्रत्येकी १० लाख रुपये देणार

पुण्यातील हिंजवडी येथील विप्रोमध्ये टीसीएस सारख्याच प्रकार घडल्याचा माजी कर्मचाऱ्याचा दावा

विराट, रोहित आणि हार्दिक जखमी, तिघेही अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेतून बाहेर

गृह आणि वाहन कर्जाच्या हप्त्यांमध्ये मोठा दिलासा, आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवला

पुढील लेख
Show comments