1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मार्च 2023 (11:27 IST)

शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही - कृषी मंत्री अब्दुल सत्तार

abdul sattar eknath shinde
facebook
मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान अशातच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात दिवसात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र असे असताना शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की, “शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही.”
 
अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे
 
अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. ही बातमी ABP माझाने दिली आहे.
 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करण्यात आली असल्याचं देखील सत्तार म्हणाले.
Published By -Smita Joshi