Dharma Sangrah

भरवस्तीती फटका दुकानांना आग २०० दुकाने जळाली

शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (14:50 IST)
औरंगाबादमध्ये फटाका मार्केटला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे २००  फटाक्यांची दुकानं जळून भस्मसात झाली आहेत. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र या भीषण आगीत  सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. प्राथमिक अहवालानुसार या भीषण  आगीत दीड ते दोन कोटींचं नुकसान झालं आहे.. 
 
 शहरातील गजबजलेल्या मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद मैदानावर दरवर्षीप्रमाणे फटाके मार्केट भरवण्यात येतो. यंदा मोठ्या उत्साहाने फटाका मार्केट स्टॉल सजवण्यात आले. मात्र, औरंगाबादकरांच्या दिवाळीला गालबोट लागले. फटाका मार्केटला अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. अवघ्या काही तासांत २००  फटाक्यांची दुकानं जळून भस्मसात झाली आहेत . या आगीत अनेक वाहनं आगीच्या भस्मसात झाली आहे. परिसरात धुराचे मोठे लोट दूरहुन दिसत होते. गंभीर बाब म्हणजे निवासी परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची माहिती अजूनही अस्पष्ट आहे. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

भाजपचा छगन भुजबळांना झटका; समीर भुजबळांना तातडीने मंत्रिपद देण्यास नकार

एलेक्जेंडर ज्वेरेवने इतिहास रचला; फ्रेंच ओपन २०२६ चे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले

LIVE: फडणवीस यांनी सांगितले की, राज्यभरात 'ड्रग्जबाबत शून्य सहनशीलता' मोहीम सुरू

National Best Friends Day 2026: राष्ट्रीय बेस्ट फ्रेंड्स डे

यवतमाळमध्ये शिवसेनेचे मोठे शक्तीप्रदर्शन, जितेश नवाडे आणि साहेबराव कांबळे शिंदे गटात सामील झाले

पुढील लेख
Show comments