संबंधित माहिती
- अटक टाळण्यासाठी खडसे यांनी हायकोर्टात धाव, सोमवारी कोर्ट महत्वाचा निकाल देणार
- एमपीएससीबाबत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईचे अजित पवार यांचे संकेत
- मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत आहे. पण मुख्यमंत्री होणं तेवढं सोपं नाही : जयंत पाटील
- राज्यात १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
- वाचा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा झाली
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे.
